शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

शहरात ‘बोगस मतदाना’साठी अनधिकृत झोपड्यांना ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:06 IST

वर्षभरापूर्वी झाली मतदार नोंदणी : पदपथांवर वास्तव्य करणाऱ्यांकडेही शासकीय दस्तऐवज

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या वाढत असून, त्यामागे राजकीय स्वार्थ असल्याचे समोर येत आहे. निवडणुकीत स्वतःचे पारडे जड करून घेण्यासाठी अनधिकृत झोपडीधारकांना शासकीय दस्तऐवज मिळवून दिले जात आहेत. त्यानुसार मागील दोन वर्षांत शहरात झोपड्या उभारून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार तयार करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी बोगस मतदारांची नोंदणी समोर येऊ लागली आहे. राजकीय व्यक्तींकडून बोगस मतदार नोंदणीसाठी अनधिकृत झोपड्यांमध्ये व पदपथांवर राहणाऱ्यांचा वापर केला जात आहे. तसे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी काही महिने अगोदर प्रभागातील मोकळ्या भूखंडांवर झोपड्यांना आश्रय दिला जातो. त्यानंतर निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मतदार नोंदणीत त्यांचा मतदार म्हणून समावेश केला जात आहे. यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना शिधापत्रिका, आधार कार्डदेखील मिळवून दिले जात आहे. यावरूनच अनेकांची वर्षानुवर्षे राजकीय गणिते ठरत आहेत. तर अशा झोपडपट्ट्यांच्या आधारावरच अनेक जण स्वतःच्या गळ्यात विजयाची माळा पाडून घेत आहेत. परंतु राजकीय स्वार्थासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांमुळे ‘स्मार्ट सिटी’ऐवजी ‘झोपड्यांचे शहर’ अशी नवी मुंबईची ओळख होऊ लागली आहे. सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर, पालिकेच्या राखीव भूखंडावर तसेच राखीव कांदळवनात या झोपड्यांना थारा मिळत आहे. मात्र निवासाचा कसलाही पुरावा नसतानाही त्यांना आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका व मतदान ओळखपत्र मिळतेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून स्थानिक राजकारण्यांकडून संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत अर्थपूर्ण हितसंबंध जोपासत हेतू साध्य करून घेतला जात असल्याचे उघड दिसून येत आहे.

पामबीच मार्गावर वास्तव्य घणसोली येथे पामबीच मार्गाच्या प्रवेशावरच कांदळवनात झोपड्या बांधल्या आहेत. पूर्वी त्या ठिकाणी गॅरेज व नर्सरी चालवली जायची. मागील काही महिन्यांत तिथे निवासी वास्तव्य होऊ लागले आहे. तर त्यांची मतदानासाठी नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. 

लॉकडाऊनपूर्वी अनेकांची नोंदणीकोपर खैरणे येथील बालाजी थिएटरसमोर पदपथावर मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी अनेकदा कारवाई झाली आहे. परंतु गतवर्षी लॉकडाऊनपूर्वी तिथल्या शेकडो जणांची मतदार नोंदणी झाली आहे. यावरून संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रशासनाचे अपयशशहर अतिक्रमणमुक्त ठेवणे हे महापालिकेसह सिडको व एमआयडीसी यांचीदेखील जबाबदारी आहे. यानंतरही मोकळ्या भूखंडावर झोपड्या उभारल्या जात असताना त्यावर कारवाईकडे चालढकल केली जाते. तर अनेकदा कारवाईचा दिखावा करून दुसऱ्याच दिवशी पुन्हा झोपड्या उभारण्याची मुभा दिली जाते. यानंतरही अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVotingमतदान