शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

उमरोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; नागरिकांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 00:29 IST

१ कोटी ४५ लाखांचा खर्च

- मयूर तांबडे नवीन पनवेल : दरवर्षी उमरोली येथील नागरिकांना पावसाळ्यात छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असे. आता नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे.पनवेल शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर उमरोली गाव वसलेले आहे. उमरोली येथे जाण्याच्या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने अतिवृष्टी झाल्यास गावात जाण्याचा मार्ग दोन-तीन दिवस बंद राहतो. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी होती.

पावसाळ्यात गाढी नदीला पूर येत असल्याने पुलावरून (फरशी) पाणी जाते. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी पालक वर्ग चिंतेत असतो. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उमरोली येथील पुलासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर उमरोली गावाच्या गाढी नदीवरील पुलासाठी १ कोटी ४५ लाख १४ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. २०१९ मध्ये नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सद्य:स्थितीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

९ जुलै २०१९ मध्ये छोट्या पुलावरून दुचाकी घेऊन जाताना दोघांचा मृत्यू झाला होता. आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य उमरोली येथील पुलावरून दुचाकीसह वाहून गेले होते. आदित्य आंब्रे यांचा मृतदेह ११ जुलै रोजी सापडून आला होता. तर सारिका आंब्रे हिचा मृतदेह १७ जुलै रोजी बेलापूर खाडीत सापडला. त्यांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकूण आठ लाखांची मदत करण्यात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी मुलाला वाचवताना पाण्यात उडी मारलेल्या खाजीदा मोहम्मद शेख (४५) या महिलेला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले होते. उमरोली येथील छोटा पूल पावसाळ्यात प्रवास करताना नागरिकांसाठी जीवघेणा ठरत होता. आता नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.

पावसाळ्यातील जीवघेण्या प्रवासातून सुटका

च्उमरोली पुलाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे रखडलेला होता. त्यामुळे नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात मनस्ताप सहन करावा लागे. दीड कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या पुलामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे.

च्उमरोली पुलाबाबत ‘लोकमत’द्वारे वारंवार वृत्त प्रसिद्ध करून सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला होता. पूल लहान असल्याने वर्दळीस अडचणीचा ठरत होता. पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीस धोकादायक ठरत होता. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने यंदा नागरिकांची जीवघेणा प्रवासातून सुटका होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईroad transportरस्ते वाहतूक