शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करणार- उदय सामंत यांचे आश्वासन

By नामदेव मोरे | Updated: September 14, 2022 17:42 IST

नवी मुंबईत बॉयलर इंडीया २०२२ प्रदर्शनास सुरुवात

नवी मुंबई : बॉयलर हा उद्योगांचा आत्मा आहे. बॉयलर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करेल. राज्यात बॉयलर पार्क उभारण्यासाठीही सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र कामगार विभाग बाष्पके संचालनालय यांच्या वतीने बॉयलर इंडीया २०२२ या तीन दिवसांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उदय सामंत यांनी या प्रदर्शनामुळे उद्योगवृद्धीसाठी फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.

बॉयलर उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनामुळे सर्वांना होईल. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी व राज्यात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बॉयलर इंडीया २०२२ प्रदर्शनाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. लहान - मोठ्या बहुतांश उद्योगामध्ये बॉयलरचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रातही बॉयलरचे उत्पादन केले जाते. या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी नवी मुंबईमध्ये तीन दिवसाच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या प्रदर्शनात विविध तज्ञ मार्गदर्शन करणार असून त्यामुळे नवीन तंत्रज्ञान व सुरक्षेविषयीची माहिती सर्वांना उपलब्ध होणार आहे.सिडको प्रदर्शन केंद्रात १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान बॉयलर इंडीया प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये २८० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. तीन दिवस चर्चासत्राची ३० सेशन होणार असून देश, विदेशातील ७० मान्यवर बॉयलर उद्योगाविषयी माहिती देणार आहेत. प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी विदेशातूनही तज्ञ आले आहेत.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNavi Mumbaiनवी मुंबई