शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

दोन टँकरची धडक, आठ तास वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:10 IST

सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता.

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता. अगदी याच घटनेची पुनरावृत्ती शुक्र वारी पहाटे ५.३० च्या दरम्यान घडली. डिझेल व डांबराची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरमध्ये धडक बसल्याने खारघर टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. या अपघातांमुळे टँकरमधील डांबर रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.विशेष म्हणजे, या मार्गाच्या मधोमध अपघातग्रस्त टँकर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. खारघर स्पेगेटी बस स्थानकापासून हिरानंदानी उड्डाणपुलापर्यंत सुमारे तीन कि. मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर डांबर सांडल्याने दुचाकींचाही या वेळी अपघात झाला. याच मार्गावर हिरानंदानी उड्डाणपुलावर कारने टेम्पोला धडक दिल्याने नजीकच्या अंतरावर अपघाताची दुसरी घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे नुकसान झाले. महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. २०१६ ते २०१८पर्यंत अद्याप ९५ जणांना या मार्गावर अपघातांमुळे आपले जीव गमवावे लागल्याची माहिती, माहिती अधिकारात दीपक सिंग या आरटीआय कार्यकर्त्याने उघड केली. विशेष म्हणजे, या मार्गावर पथदिवे नसल्याने अनेक अपघात रात्री व पहाटेच्या सुमारास घडत असतात. वाहनचालकांना समोरील वाहने अंधारामुळे दिसत नसल्यानेच अशाप्रकारे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातामुळे वाहतूककोंडी सुरळीत होण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. खारघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे हे पहाटेपासून घटनास्थळी उपस्थित होते.सिग्नल यंत्रणा बंदसायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाºया ठेकेदाराने अद्याप सिग्नल बसविले नाहीत. सानपाडा, नेरूळ, सीबीडी, खारघर येथे सिग्नल नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. खारघरमध्ये सकाळी व सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी होत असून वाहतूक पोलिसांना जादा मनुष्यबळ उपलब्ध करावे लागत आहे. सिग्नल नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.महामार्ग अंधारातमहामार्गावरील बहुतांश विद्युत दिवे बंद आहेत. अंधार असल्यामुळे वाहनचालकांना समोरील वाहनांचा व रोडवरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अंधारामुळे पहाटेच्या वेळी अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. खारघरमध्ये झालेला अपघातही अपुºया प्रकाशामुळे झाल्याचे बोलले जात आहे.अर्धवट राहिलेली कामेमहामार्गावर तुर्भे येथील उड्डाणपुलाचे काम अर्धवट राहिलेले आहे. नेरूळ ते उरण फाटा दरम्यानच्या पादचारी भुयारी मार्गांचे काम महापालिकेने केले आहे; परंतु सीबीडीच्या पुढील भुयारी मार्गांचे काम रखडले असून नागरिकांना धोकादायकपणे रोड ओलांडावा लागत आहे.पावसाळ्यात अपघात वाढणारपाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात महामार्गावर दोन गंभीर अपघात झाले आहेत. महामार्गावरील रखडलेली कामे. सिग्नल यंत्रणेचा अभाव व अंधारामुळे पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई