शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

दोन टँकरची धडक, आठ तास वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:10 IST

सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता.

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता. अगदी याच घटनेची पुनरावृत्ती शुक्र वारी पहाटे ५.३० च्या दरम्यान घडली. डिझेल व डांबराची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरमध्ये धडक बसल्याने खारघर टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. या अपघातांमुळे टँकरमधील डांबर रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.विशेष म्हणजे, या मार्गाच्या मधोमध अपघातग्रस्त टँकर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. खारघर स्पेगेटी बस स्थानकापासून हिरानंदानी उड्डाणपुलापर्यंत सुमारे तीन कि. मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर डांबर सांडल्याने दुचाकींचाही या वेळी अपघात झाला. याच मार्गावर हिरानंदानी उड्डाणपुलावर कारने टेम्पोला धडक दिल्याने नजीकच्या अंतरावर अपघाताची दुसरी घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे नुकसान झाले. महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. २०१६ ते २०१८पर्यंत अद्याप ९५ जणांना या मार्गावर अपघातांमुळे आपले जीव गमवावे लागल्याची माहिती, माहिती अधिकारात दीपक सिंग या आरटीआय कार्यकर्त्याने उघड केली. विशेष म्हणजे, या मार्गावर पथदिवे नसल्याने अनेक अपघात रात्री व पहाटेच्या सुमारास घडत असतात. वाहनचालकांना समोरील वाहने अंधारामुळे दिसत नसल्यानेच अशाप्रकारे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातामुळे वाहतूककोंडी सुरळीत होण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. खारघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे हे पहाटेपासून घटनास्थळी उपस्थित होते.सिग्नल यंत्रणा बंदसायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाºया ठेकेदाराने अद्याप सिग्नल बसविले नाहीत. सानपाडा, नेरूळ, सीबीडी, खारघर येथे सिग्नल नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. खारघरमध्ये सकाळी व सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी होत असून वाहतूक पोलिसांना जादा मनुष्यबळ उपलब्ध करावे लागत आहे. सिग्नल नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.महामार्ग अंधारातमहामार्गावरील बहुतांश विद्युत दिवे बंद आहेत. अंधार असल्यामुळे वाहनचालकांना समोरील वाहनांचा व रोडवरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अंधारामुळे पहाटेच्या वेळी अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. खारघरमध्ये झालेला अपघातही अपुºया प्रकाशामुळे झाल्याचे बोलले जात आहे.अर्धवट राहिलेली कामेमहामार्गावर तुर्भे येथील उड्डाणपुलाचे काम अर्धवट राहिलेले आहे. नेरूळ ते उरण फाटा दरम्यानच्या पादचारी भुयारी मार्गांचे काम महापालिकेने केले आहे; परंतु सीबीडीच्या पुढील भुयारी मार्गांचे काम रखडले असून नागरिकांना धोकादायकपणे रोड ओलांडावा लागत आहे.पावसाळ्यात अपघात वाढणारपाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात महामार्गावर दोन गंभीर अपघात झाले आहेत. महामार्गावरील रखडलेली कामे. सिग्नल यंत्रणेचा अभाव व अंधारामुळे पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई