शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

महापालिकेला दोन नवीन पुरस्कार

By admin | Updated: May 6, 2017 06:29 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेचा राज्य शासनानेही गौरव केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेचा राज्य शासनानेही गौरव केला आहे. राज्यात सर्वाधिक कर वसुली व कचरा वर्गीकरणामध्ये उत्तम कामगिरी केल्याप्रकरणी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी पत्रकार परिषद घेवून पालिकेला केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिलेल्या दोन पुरस्कारांविषयी माहिती दिली. केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला देशात ८ वा व पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक मिळाला. पहिल्या दहा शहरांमध्ये राज्यातील एकमेव शहर आहे. केंद्र शासनाबरोबर राज्य शासनानेही नवी मुंबईचा सन्मान केला आहे. महापालिकेने घनकचरा वर्गीकरणामध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेवून विशेष सन्मान केला आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ चे काटेकोर पालन पालिकेने केले आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात आहे. प्रत्येक सोसायटीला सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचे व ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचे मोठे डबे वितरित केले आहेत. सद्यस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातून १६५ ते १७५ मेट्रिक टन ओला कचरा व ८० ते ९० मेट्रिक टन सुका कचरा संकलित केला जात आहे. याशिवाय हरित कचऱ्याचे सरासरी प्रमाण ५० मेट्रिक टन एवढे आहे. याशिवाय पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालून २८२ ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून १५ लाख ५६ हजार इतकी दंड वसुली व प्लास्टीक जप्त करण्यात आले असून याची दखल घेवून राज्य शासनाने पालिकेचा गौरव केला आहे. महापालिकेने महसूल संकलनामध्येही राज्यात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक संस्था बंद केल्यानंतरही महापालिकेने २०१५ - १६ मध्ये तब्बल ८७० कोटी कर वसुली केली होती. २०१६ - १७ या आर्थिक वर्षामध्ये एलबीटीच्या माध्यमातून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख रूपये वसुली केली आहे. यापूर्वीच्या थकबाकीदारांकडून ७० कोटी रूपये वसूल करण्यात यश मिळविले आहे. मालमत्ता कर विभागानेही गतवर्षीच्या ५०७ कोटीमध्ये १४० कोटीची भर टाकून तब्बल ६४७ कोटी रूपये कर वसूल केला आहे. या कामगिरीची दखल घेवून शासनाने प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या वेळी सभागृहनेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेने केलेल्या कामाची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. स्वच्छतेमध्ये देशात ८ वा क्रमांक मिळाला असून भविष्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबईस्वच्छ भारत अभियानामध्ये मिळालेले यश लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिकांचे आहे. सर्वांनी संघटितपणे काम केल्यामुळे महापालिकेला देशपातळीवर नावलौकिक मिळाला. राज्य शासनानेही दोन पुरस्कार दिले आहेत. भविष्यात अधिक चांगले काम केले जाईल. - रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई