शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

महापालिकेला दोन नवीन पुरस्कार

By admin | Updated: May 6, 2017 06:29 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेचा राज्य शासनानेही गौरव केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या नवी मुंबई महापालिकेचा राज्य शासनानेही गौरव केला आहे. राज्यात सर्वाधिक कर वसुली व कचरा वर्गीकरणामध्ये उत्तम कामगिरी केल्याप्रकरणी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त रामास्वामी एन. यांनी पत्रकार परिषद घेवून पालिकेला केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिलेल्या दोन पुरस्कारांविषयी माहिती दिली. केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला देशात ८ वा व पश्चिम विभागातील प्रथम क्रमांक मिळाला. पहिल्या दहा शहरांमध्ये राज्यातील एकमेव शहर आहे. केंद्र शासनाबरोबर राज्य शासनानेही नवी मुंबईचा सन्मान केला आहे. महापालिकेने घनकचरा वर्गीकरणामध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेवून विशेष सन्मान केला आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ चे काटेकोर पालन पालिकेने केले आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात आहे. प्रत्येक सोसायटीला सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचे व ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचे मोठे डबे वितरित केले आहेत. सद्यस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातून १६५ ते १७५ मेट्रिक टन ओला कचरा व ८० ते ९० मेट्रिक टन सुका कचरा संकलित केला जात आहे. याशिवाय हरित कचऱ्याचे सरासरी प्रमाण ५० मेट्रिक टन एवढे आहे. याशिवाय पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालून २८२ ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून १५ लाख ५६ हजार इतकी दंड वसुली व प्लास्टीक जप्त करण्यात आले असून याची दखल घेवून राज्य शासनाने पालिकेचा गौरव केला आहे. महापालिकेने महसूल संकलनामध्येही राज्यात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक संस्था बंद केल्यानंतरही महापालिकेने २०१५ - १६ मध्ये तब्बल ८७० कोटी कर वसुली केली होती. २०१६ - १७ या आर्थिक वर्षामध्ये एलबीटीच्या माध्यमातून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख रूपये वसुली केली आहे. यापूर्वीच्या थकबाकीदारांकडून ७० कोटी रूपये वसूल करण्यात यश मिळविले आहे. मालमत्ता कर विभागानेही गतवर्षीच्या ५०७ कोटीमध्ये १४० कोटीची भर टाकून तब्बल ६४७ कोटी रूपये कर वसूल केला आहे. या कामगिरीची दखल घेवून शासनाने प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या वेळी सभागृहनेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेने केलेल्या कामाची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. स्वच्छतेमध्ये देशात ८ वा क्रमांक मिळाला असून भविष्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबईस्वच्छ भारत अभियानामध्ये मिळालेले यश लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिकांचे आहे. सर्वांनी संघटितपणे काम केल्यामुळे महापालिकेला देशपातळीवर नावलौकिक मिळाला. राज्य शासनानेही दोन पुरस्कार दिले आहेत. भविष्यात अधिक चांगले काम केले जाईल. - रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई