शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दोन महिन्यांत शहरातील ३०० पशू-पक्ष्यांना उष्माघात

By admin | Updated: April 10, 2017 06:22 IST

दिवसेंदिवस शहरातील तापमानाचा पारा वाढत असून, या उष्म्याचा त्रास मुक्या जनावरांनाही होत आहे

प्राची सोनवणे / नवी मुंबई दिवसेंदिवस शहरातील तापमानाचा पारा वाढत असून, या उष्म्याचा त्रास मुक्या जनावरांनाही होत आहे. हिटस्ट्रोक, उलटी, जुलाबाने त्रस्त पशू-पक्ष्यांवर उपचारासाठी शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात रांगा लागल्या आहेत. कावळे, कबुतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांवर वाढत्या उष्णतेचा दुष्परिणाम होत असून, नागरिकांनी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन प्राणिप्रेमी संस्थांनी केले आहे. गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताने त्रस्त शहरातील ३०० पशू-पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी ३० हून अधिक मुक्या जीवांना प्राण गमवावे लागले आहे. प्रखर सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी पशू-पक्षी आसरा शोधत सावलीत बसतात. मात्र, हा उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने हवेतील उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते. तसेच दम लागतो, हिटस्ट्रोक होतो आणि भोवळ येऊन ते पडतात. अशा वेळी काही पक्षी गंभीर जखमी होतात आणि काहींना प्राण गमवावे लागत असल्याची माहिती भूमी जीवदया संवर्धन ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे प्रमुख सागर सावला यांनी सांगितले. ४० अंशापर्यंत पोहोचलेला पारा, वातावरणातील असह्य उष्णतेमुळे गेल्या दोन महिन्यांत नवी मुंबई परिसरातील ३०० पशू-पक्ष्यांवर उपचार करण्यात आल्याची माहिती सावला यांनी दिली. तुर्भे सेक्टर २३ येथील जनता मार्केट परिसरातील रुग्णालयात या पशू-पक्ष्यांवर उपचार केले जात आहेत. घार, घुबड, कोकीळ, पोपट, चिमणी आदी पक्षी डिहायड्रेशन, हिटस्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल झाल्याचेही सावला यांनी सांगितले. जुलाब, उलटीमुळे त्रासलेले, तसेच त्वचारोग झालेले कुत्रे, मांजरीही रुग्णालयात दाखल झाले आहेत.शहरातील हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आसरा शोधावा लागत आहे. पशू-पक्ष्यांसाठी असलेली पाणी पिण्याची ठिकाणेही कमी होत चालल्याने त्यांना पाण्याच्या शोधात लांबवर जावे लागते. उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने घरोघरी एसी, कुलर लावून घेतले आहे. एसीच्या थंड हवेचा घरातील पाळीव प्राण्यांना त्रास होतो. अनेक जण प्राण्यांना स्वत:च उपचार देतात. यामुळे प्राण्यांचा आजार पूर्णपणे बरा होईल, अशी शाश्वती देता येत नसल्याची माहिती पशुवैद्यकांनी दिली.काळजी कशी घ्यावी?प्राण्यांचे जेवण नेहमी ताजे असावे. ग्लुकोज, मल्टिव्हिटॅमिन सिरप पिण्यास द्यावे.खिडकीवर, बाल्कनीत छोटेखानी भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी काढून ठेवावे. दोन-तीन तासांनंतर हे पाणी बदलावे.घरच्या घरी उपचार देण्याऐवजी पशुवैद्यकांचा सल्ला नेहमी घ्यावा.मांसाहार प्राण्यांचे आवडते खाद्य असले तरी उन्हाळ्यात हे पदार्थ त्यांना सारखे देऊ नयेत. उन्हात हे पदार्थ लगेच खराबही होतात. त्यामुळे प्राण्यांना जुलाब, उलटीसारखे आजार होतात.

उन्हाळ्यात प्राण्यांना दूध, दह्यासोबत शाकाहारी पदार्थ द्यावेत.