शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे दोन लाख लाभधारक

By admin | Updated: October 17, 2015 01:58 IST

सामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात

जयंत धुळप, अलिबागसामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात लागू केलेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत दोन लाख ४४ हजार २३५ लाभधारकांची नोंदणी झाली आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे काम विविध राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून करण्यात येत असून, या योजनेच्या यशस्वितेसाठी सर्व बँका सक्रिय सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ७० हजार ५५, बँक आॅफ इंडियाने ४२ हजार २६९, बँक आॅफ महाराष्ट्रने २५ हजार ३४६, स्टेट बँक आॅफ इंडियाने २४ हजार १५५, देना बँकेने १८ हजार २७३, आयडीबीआय बँकने १४ हजार २२५, युनियन बँक आॅफ इंडियाने ८ हजार ८८६ , बँक आॅफ बडोदाने ९ हजार १९४, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ४ हजार ०५०, सिंडिकेट बँकने ३ हजार ६३०, इंडियन ओवरसिस बँकेने ४ हजार १५, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने ३ हजार ४५३, कॉर्पोरेशन बँकने २ हजार ७७३, अ‍ॅÞक्सिस बँकेने २ हजार ५०९, आयसीआयसीआय बँकेने १ हजार ८२०, कॅनरा बँकेने १ हजार ५५१, पंजाब नॅशनल बँकेने १ हजार ७९६, स्टेट बँक आॅफ हैदराबादने १ हजार ४१३, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेने १ हजार ३२१, युको बँकने ८९०, विजया बँकेने ५४७, एचडीएफसी बँकेने ५००, फेडरल बँकेने ३७८, रत्नाकर बँकेने २७, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ हजार १५९ असे जिल्ह्यात एकूण २ लाख ४४ हजार २३५ लाभधारक पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत सहभागी झाले आहेत.सामान्य नागरिकांना सुरक्षा मिळावी, एखाद्या अपघाताने त्यांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये, त्यांना मदत मिळून त्यांचे जीवन सावरावे यासाठी पंतप्रधान सुरक्षा योजना राबविण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. केवळ १२ रुपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. मात्र दरवर्षी नूतनीकरण आवश्यक राहणार आहे. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांकाद्वारे योजनेत सहभागी होता येते. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाऊन, पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक राहणार आहे.