शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

योजनेचे दोन लाख लाभधारक

By admin | Updated: October 17, 2015 01:58 IST

सामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात

जयंत धुळप, अलिबागसामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात लागू केलेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत दोन लाख ४४ हजार २३५ लाभधारकांची नोंदणी झाली आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे काम विविध राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून करण्यात येत असून, या योजनेच्या यशस्वितेसाठी सर्व बँका सक्रिय सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ७० हजार ५५, बँक आॅफ इंडियाने ४२ हजार २६९, बँक आॅफ महाराष्ट्रने २५ हजार ३४६, स्टेट बँक आॅफ इंडियाने २४ हजार १५५, देना बँकेने १८ हजार २७३, आयडीबीआय बँकने १४ हजार २२५, युनियन बँक आॅफ इंडियाने ८ हजार ८८६ , बँक आॅफ बडोदाने ९ हजार १९४, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ४ हजार ०५०, सिंडिकेट बँकने ३ हजार ६३०, इंडियन ओवरसिस बँकेने ४ हजार १५, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने ३ हजार ४५३, कॉर्पोरेशन बँकने २ हजार ७७३, अ‍ॅÞक्सिस बँकेने २ हजार ५०९, आयसीआयसीआय बँकेने १ हजार ८२०, कॅनरा बँकेने १ हजार ५५१, पंजाब नॅशनल बँकेने १ हजार ७९६, स्टेट बँक आॅफ हैदराबादने १ हजार ४१३, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेने १ हजार ३२१, युको बँकने ८९०, विजया बँकेने ५४७, एचडीएफसी बँकेने ५००, फेडरल बँकेने ३७८, रत्नाकर बँकेने २७, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १ हजार १५९ असे जिल्ह्यात एकूण २ लाख ४४ हजार २३५ लाभधारक पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत सहभागी झाले आहेत.सामान्य नागरिकांना सुरक्षा मिळावी, एखाद्या अपघाताने त्यांचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये, त्यांना मदत मिळून त्यांचे जीवन सावरावे यासाठी पंतप्रधान सुरक्षा योजना राबविण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. केवळ १२ रुपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. मात्र दरवर्षी नूतनीकरण आवश्यक राहणार आहे. बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्रमांकाद्वारे योजनेत सहभागी होता येते. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर नावे टाकला जाऊन, पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक राहणार आहे.