शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

खारघर-पनवेल प्रवासासाठी दोन तास

By admin | Updated: July 16, 2017 02:48 IST

खारघर ते पनवेल महामार्गावरून प्रवास करताना एरवी १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, सध्या रस्त्यावरील खड्डे, साचलेले पाणी यामुळे हा प्रवास सुमारे दोन तासांवर गेला

- वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघर ते पनवेल महामार्गावरून प्रवास करताना एरवी १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, सध्या रस्त्यावरील खड्डे, साचलेले पाणी यामुळे हा प्रवास सुमारे दोन तासांवर गेला आहे. देशातील व्यस्त महामार्गापैकी सायन-पनवेल महामार्ग ओळखला जातो. त्यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सायन-पनवेल महामार्गावर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अवजड वाहनासाठी टोल वसूल करण्यात येतो. मात्र, त्या तुलनेने रस्त्याची देखरेख होत नाही. रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. मोठमोठे खड्डे चुकवण्याच्या नादात वाहने एकमेकांवर धडकण्याचे प्रकार वाढले आहेत. हिरानंदानी ते कोपरा पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. पिकअवर्समध्ये ही परिस्थिती आणखीनच गंभीर होते. टोल प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवले जात आहे. मान्सूनपूर्व या ठिकाणी कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारची कामे केली नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांकडून कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने कंत्राटदारांना भय राहिले नसल्याची प्रतिक्रिया या मार्गावरून दररोज प्रवास करणारे अमित रणदिवे यांनी दिली. कामोठे येथे एका मार्गिकेचे काम रखडल्याने वाहनांना कामोठेत प्रवेश करण्यासाठी कळंबोली उड्डाणपुलाखालून वळसा घालून यावे लागते. त्यानंतर पुढे जाताना कळंबोली सर्कलजवळ चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे मोठी कोंडी होते. पावसाळ्यातील रस्त्यांची होणारी दुरवस्था पाहता, सार्वजनिक बांधकाम खाते व टोल प्रशासन दोघांशी पत्रव्यवहार केले होते. मात्र, तरीही दखल घेतली गेलेली नाही. या मार्गावर होणारी वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. - प्रवीण पांडे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा