शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंड योजनेला मरगळ , प्रकल्पग्रस्तांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 00:32 IST

नवी मुंबईतील साडेबारा टक्केची जवळपास ८२ टक्के प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित आठ टक्के प्रकरणे वारस दाखल, न्यायालयीन दावे, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांमुळे रखडली आहेत.

नवी मुंबई : साडेबारा टक्के भूखंड योजनेला विविध कारणांमुळे मरगळ आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अगदी नाममात्र प्रकरणे शिल्लक आहेत. परंतु भूखंड उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. तर उरण आणि पनवेल तालुक्यात अद्याप साडेबारा टक्के भूखंड वाटपाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. परंतु विविध करणांमुळे भूखंड वाटपाची प्रक्रिया ठप्प पडली आहे. दरम्यान, सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी या योजनेला गती देतील, असे प्रकल्पग्रस्तांना वाटते आहे.नवी मुंबईतील साडेबारा टक्केची जवळपास ८२ टक्के प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित आठ टक्के प्रकरणे वारस दाखल, न्यायालयीन दावे, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांमुळे रखडली आहेत. विशेष म्हणजे शिल्लक राहिलेली प्रकरणे तातडीने निकाली काढता यावीत, यासाठी राज्य सरकारने लिंकेजची अटही शिथिल केली आहे. त्यामुळे पात्रताधारकांना ज्या विभागात भूखंड उपलब्ध असेल, तेथे देणे शक्य होणार नाही. त्यानंतरही या योजनेला म्हणावी तशी गती प्राप्त झाली नसल्याचे दिसून आले आहे. यातच कोविडमुळे मागील पाच महिन्यांपासून सिडकोचे कामकाज ठप्प पडले आहे. आता परिस्थिती सुधारत असतानाच सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संजय मुखर्जी यांची नियुक्ती झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.उरण-द्रोणागिरी नोडमधील साडेबारा टक्के भूखंडांची सोडत अनेक वर्षांपासून रखडली आहे. सिडकोच्या संबंधित विभागाकडून प्रत्येक वेळी सोडतीची घोषणा केली जाते. परंतु कार्यवाहीच होत नाही. मागील दोन वर्षांपासून हाच खेळ सुरू असल्याने या विभागातील प्रकल्पग्रस्तांचा संयम सुटत चालला आहे. सिडकोच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका द्रोणागिरी परिसरातील प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. अनेकांना सोडत काढूनही भूखंडांचा ताबा मिळालेला नाही. भूखंड देण्यासाठी सिडकोकडे जागाच नसल्याने हा पेच निर्माण झाला आहे. पाचशेपेक्षा अधिक प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडांची सोडत काढूनसुद्धा त्यांना आतापर्यंत भूखंडाचे वाटप करण्यात आलेले नाही.द्रोणागिरी नोडचे नियोजन करताना संबंधित विभागाने साडेबारा टक्के भूखंड योजनेसाठी जागा आरक्षित केली नाही. त्यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी खासगीत सांगतात. द्रोणागिरी नोडमधील प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटप करण्यासाठी सुमारे ३५ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने संबंधित विभाग मागील तीन वर्षांपासून जागेचा शोध घेत आहे.५00 लाभधारकांची बोळवणसिडकोने २00७-0८मध्ये द्रोणागिरी परिसरातील प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडांची पहिली सोडत काढली होती. परंतु याद्वारे वाटप करण्यात आलेले २७0 भूखंड खारफुटी आणि सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्याने मागील १२ वर्षांपासून या भूखंडांचा विकास होऊ शकलेला नाही. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी याच विभागातील प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने पुन्हा सोडत काढून जवळपास पाचशे लाभधारकांना भूखंड इरादीत केले. परंतु आजतागायत यातील लाभधारकांना भूखंडांचा ताबा मिळालेला नाही.चिर्ले क्षेत्रातील जमिनीची चाचपणीखाडीचे पाणी शिरून द्रोणागिरी परिसरात मोठ्या प्रमाणात खारफुटी व दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोची पंचवीस हेक्टरपेक्षा अधिक जमीन बाधित झाल्याने साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर उपाय म्हणून द्रोणागिरी परिसरातील चिर्ले इथल्या बटरफ्लाय झोन परिसरातील जागा प्रकल्पग्रस्तांना देण्याचा विचार सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केला होता. त्यानुसार संबंधित जागा संपादन करण्याची कार्यवाही सिडकोकडून सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई