शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

गॅरेजचालकांनी अडविला तुर्भे मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:37 IST

वाशी-तुर्भे मार्गावर ट्रक टर्मिनलजवळील गॅरेजचालकांनी मुख्य रोडवर वाहने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, वाहतूककोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशी-तुर्भे मार्गावर ट्रक टर्मिनलजवळील गॅरेजचालकांनी मुख्य रोडवर वाहने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर पालिका व वाहतूक पोलीस काहीही कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात गॅरेजचालकांच्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. व्यावसायिकांकडून रस्ते व पदपथ अडविले जात आहेत. वाशी-तुर्भे मुख्य रोडवर ट्रकटर्मिनल आवारातील गॅरेजचालकांनी व्यवसाय सुरू केला आहे. दुरुस्तीसाठी आलेले ट्रक सर्व्हिस रोड व मुख्य रोडवरील एक लेनवर उभे केले जात आहेत. याच ठिकाणी बिनधास्तपणे दुरुस्तीची कामे केली जात आहेत. या अतिक्रमणामुळे तुर्भेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. यापूर्वी याच परिसरामध्ये मोटारसायकलच्या धडकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या रोडवर अरेंजा सर्कलजवळ वाहतूक पोलीस चौकी असून, पुढे अन्नपूर्णा चौकामध्ये मुख्य वाहतूूक चौकी आहे; परंतु वाहतूक समस्या निर्माण करणाऱ्यांवर काहीही कारवाई केली जात नाही.या परिसरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची पाच मार्केट आहेत. याशिवाय ट्रक टर्मिनल असल्याने रोज तीन ते चार हजार ट्रकची वर्दळ सुरू असते. रोडवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, महापालिकेच्या विभाग कार्यालयानेही कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण ढेबे यांनी केली असून याविषयी पालिका व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.