शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

तुर्भे एमआयडीसीमध्ये तिहेरी हत्याकांड, लुटीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 05:00 IST

तुर्भे एमआयडीसी येथील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना घडली आहे.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असता, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातोड्याने तसेच धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या झाली असून, लुटीच्या उद्देशाने हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी भागात हा प्रकार घडला आहे. तिथल्या अब्दुल स्क्रॅब ट्रेडर्स या भंगाराच्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या तिघा कामगारांची हत्या झाली आहे. राजेश पाल (३०), नौशाद खान (१९) व व इर्शाद खान (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी नौशाद व इर्शाद हे भाऊ आहेत.राजेश, नौशाद, इर्शाद हे तिघेही झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करून हत्या झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या सहभागाचीही शक्यता नाकारता येत नाही.शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सदर भंगाराच्या गोडाऊनचे मालक नसीम हे त्या ठिकाणी आले असता, कामगारांच्या राहण्याच्या जागेत तिघांचेही मृतदेह आढळून आले. हातोड्याने व कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह तिथल्या खाटेखाली ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी गोडाऊनच्या गल्ल्यातील काही रक्कमही चोरीला गेल्याचे समोर आले. त्यावरून तिघांची हत्या लुटीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी सांगितले.>रहिवाशांनी केली होती तक्रारतिहेरी हत्याकांडाच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर परिसरात मोकळ्या मैदानामध्ये अनधिकृत भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा परिसरात वावर वाढत आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनांकडे तक्रारही केलेली आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.