शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी मंदिर प्रकरणी ‘टीटीडी’ला दहा हजारांचा दंड, पर्यावरणाबाबत चिंता; उत्तराच्या विलंबाबत फटकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:45 IST

मंदिर संस्थेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नवी मुंबई : उलवे येथील बालाजी मंदिर प्रकरणात एनजीटीने (राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने) पर्यावरणविषयक चिंता व्यक्त करणाऱ्या अर्जाला उत्तर देण्यास विलंब केल्याबद्दल टीटीडी (तिरुमला तिरुपती देवस्थानम) च्या वकिलांना फटकारले आहे. मंदिर संस्थेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

एनजीटीच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने शुक्रवारी नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी सुरू असताना टीटीडीचे वकील सत्य सभरवाल यांचे प्रतिनिधित्व करणारे कनिष्ठ वकील यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आणखी काही वेळ मागितला.  यावर न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. साडेचार महिन्यांपूर्वी आदेश देऊनही टीटीडीने उत्तर सादर केले नसल्याचे सांगितले. 

समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे धोकाटीटीडीच्या कनिष्ठ वकिलांनी एनजीटी खटला दाखल झाल्यापासून आंध्र प्रदेशातील सरकारमध्ये बदल झाला आहे. या कारणास्तव विलंब झाल्याचे सांगितले. परंतु, खंडपीठाने ही याचिका न स्वीकारता पुढील सुनावणी २० मार्च रोजी ठेवली. उलवे किनाऱ्यावरील नवी मुंबई मंदिर प्रकल्पाला पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करण्याव्यतिरिक्त समुद्राच्या वाढत्या पातळीमुळेही धोका असल्याचे नॅट कनेक्टने यापूर्वीच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई