शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

आरोग्याच्या लक्षवेधीवरून महासभेत गोंधळ

By admin | Updated: September 10, 2015 00:01 IST

शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये

नवी मुंबई : शहरातील डेंग्यू व मलेरियाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडू न दिल्यामुळे शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर या विषयावर शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. नवी मुंबईमध्ये मागील दोन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया व तापाच्या साथीने थैमान घातले आहे. पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या मुलांनाही डेंग्यू झाला आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनास साथ नियंत्रणामध्ये आणण्यात अपयश आले असून लोकप्रतिनिधींसह शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय चौगुले व राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी लक्षवेधी मांडली होती. परंतु महापौरांनी हा विषय गंभीर असून त्यावर सविस्तर चर्चा करता यावी यासाठी शुक्रवारी विशेष महासभा बोलावण्याचे आश्वासन दिले. परंतु लक्षवेधीवर तत्काळ चर्चा करण्यात यावी. शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेंग्यू, मलेरियाचा प्रश्न गंभीर झाला आहे असे स्पष्टीकरण दिले. परंतु शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त करून महापौरांना घेराव घातला. विरोधक आक्रमक झाल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवकही महापौरांच्या आसनासमोर जावून तुम्ही कामकाज सुरू करा, असे आवाहन केले. जवळपास एक तास गोंधळ सुरू होता. सत्ताधारी व विरोधी पक्षांचा गोंधळ सुरू असल्यामुळे अखेर महापौरांनी कामकाज सुरू केले. गोंधळामध्येच चार विषय मंजूर करून जेवणाची सुटी घोषित केली यामुळे गोंधळ थांबला. आता या विषयावर शुक्रवारी विशेष सभा होणार असून त्यामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’ची दखल‘लोकमत’ने आरोग्याच्या प्रश्नावर सातत्याने लक्ष वेधले आहे. अनेक नगरसेवकांनी लोकमत सभागृहात आणला होता. शिवसेना नगरसेवक रामदास पवळे यांनी लोकमतमधील बातम्यांचा उल्लेख करून आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली. प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी नकोमहापौरांनी विशेष महासभा घेण्याचे जाहीर केल्यानंतरही विरोधकांनी गोंधळ व घोषणाबाजी सुरूच ठेवली. यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी नाराजी व्यक्त केली. प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंटबाजी करणे थांबवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.