शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
5
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
6
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
7
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
8
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
9
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
10
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
11
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
12
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
13
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
14
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
15
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
16
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
17
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
18
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
19
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
20
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर

कचराकुंडीमुक्त संकल्पनेला ठेंगा

By admin | Updated: December 22, 2016 06:44 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने शहरात कचराकुंडीमुक्त अभियान सुरू केले आहे. परंतु महापालिकेच्या या संकल्पनेला

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने शहरात कचराकुंडीमुक्त अभियान सुरू केले आहे. परंतु महापालिकेच्या या संकल्पनेला शहरवासीयांनी ठेंगा दाखविला आहे. पूर्वी कचराकुंडी असलेल्या ठिकाणांवर कचरा टाकू नये, असे फलक लावले आहेत. परंतु या फलकांकडे दुर्लक्ष करीत सर्रासपणे कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई शहर कचरामुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, अशाप्रकारचे आवाहन केले जात आहे. इतकेच नव्हे तर वसाहतीअंतर्गत असलेल्या सार्वजनिक कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. त्याजागेवर महापालिकेच्या वतीने फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. परंतु नागरिकांनी या फलकांकडे डोळेझाक करीत कुंडी असलेल्या जागेवर कचरा टाकणे सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. सीबीडी, बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली आदी परिसरात हा प्रकार दिसून येतो. दरम्यान, आवाहन करूनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत महापालिकेच्या संबंधित विभागाने दिले आहेत. (प्रतिनिधी)