शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पनवेलमधील आदिवासींच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:26 IST

टॉवरवाडीही तहानलेली : गावच्या पायथ्याला धरण असूनही पाण्यासाठी भटकंती

नवी मुंबई : पनवेलला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणाच्या टेकडीवरील टॉवरवाडी आदिवासी पाड्यातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. दोन्ही विहिरींनी तळ गाठला असून नागरिकांना धरणात खड्डे काढून तहान भागवावी लागत आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे नाव देशाच्या नकाशावर गेले आहे. भविष्यात नैना परिसरामध्ये तब्बल २३ स्मार्ट सिटी तयार केल्या जाणार आहेत. पुढील पाच वर्षामध्ये तब्बल ६० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरामध्ये केली जात आहे. देशातील सर्वात वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून पनवेल तालुक्याकडे पाहिले जात आहे. विकासाचे स्वप्न दाखविताना येथील समस्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. देहरंग धरणातून पनवेल शहराला पाणी पुरवठा केला जातो.जवळपास एप्रिलपर्यंत धरणातील पाणीसाठा शहराला पुरतो. परंतु याच परिसरातील आदिवासी पाड्यांना मात्र दोन हांडे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सद्यस्थिती टॉवरवाडी आदिवासी पाड्यामध्ये पिण्यासाठी पाणीच नाही. गावातील दोन्ही विहिरींनी तळ गाठला आहे. १५० घरांमधील नागरिकांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. नागरिकांनी धरणामध्ये ठिकठिकाणी खड्डे काढून पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक वर्षी मे व जूनमध्ये भीषण टंचाईला जामोरे जावे लागत आहे. आदिवासींवरील हे संकट दूर करण्यात यावे, वर्षभर पुरेल अशाप्रकारे पाणी योजना राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून किमान पुढील वर्षभरामध्ये टॉवरवाडी पाणीटंचाईमुक्त होईल अशा प्रकारे योजना राबवावी व पाण्याची शोकांतिका थांबवावी, अशी विनंतीही रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई