शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:46 IST

आदिवासी समाजाच्या वन हक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. आमचा आदिवासींचा इतिहास लिहिला गेला नाही, कारण आमच्या समाजात सुशिक्षित माणसेच नव्हती, परंतु आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही

- जयंत धुळपअलिबाग : आदिवासी समाजाच्या वन हक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. आमचा आदिवासींचा इतिहास लिहिला गेला नाही, कारण आमच्या समाजात सुशिक्षित माणसेच नव्हती, परंतु आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही, अशी प्रखर प्रतिक्रि या आदिवासी युवकांनी मंगळवारी पेण येथे व्यक्त केली.सर्व शिक्षित आदिवासी युवक व युवती हुतात्मा नाग्या कातकरीच्या ८८ व्या स्मृतिदिनानिमित्त पेण येथे अंकुर ट्रस्ट व लोकमंच संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्र मात बोलत होते. या वेळी पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांना लेखी निवेदनही दिले. तत्पूर्वी रायगड बाजार पेण येथून आपल्या पारंपरिक वाद्यवृंदासह आदिवासींनी वाजतगाजत भव्य मिरवणूक काढून लहान आदिवासी बालकांनी केलेल्या आदिम जमातीच्या वेशभूषेने पेणकरांचे लक्ष वेधले.स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन गेल्या २० वर्षांपासून रायगड जिल्ह्यात पाळण्यात येतो. आदिवासींच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील आदिवासींनी प्रखर लढा देऊन आपल्या हुतात्मा नाग्या महादू कातकरीचे नाव चिरनेरच्या मूळ स्तंभावर कोरले होते. तेव्हापासून हुतात्मा नाग्याची चळवळ आदिवासींच्या अस्मितेची चळवळ म्हणून ओळखली जाते. या दिवशी ठिकठिकाणी कातकरी आदिवासी एकत्र येऊन आपल्या उपजीविकेच्या हक्कांबद्दल मांडणी करत असतात.कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासींची अन्नसुरक्षा राखण्यासाठी वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी गरजेची आहे, तसेच रेशनवरील धान्याच्या ऐवजी रोख रक्कम टाकण्याचा शासनाचा निर्णय कसा विसंगत आहे हे आदिवासी भाषेतील भाषणात प्रभावीपणे मांडले.तहसीलदार पाटणे यांनी वनमित्र अभियानाची सविस्तर माहिती देऊन याबाबतच्या अडचणींचे निवारण प्रभावीपणे करण्याचे आश्वासन सभेत दिले. या प्रसंगी आदिवासी सरपंच नीरा मधे, भारती पवार, गौरी कसबे, हर्षली ढेबे, विनोद वाघमारे यांनी आपले विचार मांडले. या वेळी आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रतिनिधी अजित पवार, पुरवठा अधिकारी हरी हडके यांनी योजनांची सविस्तर माहिती देऊन अडचणी समजावून घेतल्या. अंकुर संस्थेच्या झेप आदिवासी आश्रमातील मुलांनी कातकरी भाषेतील गाणी व नृत्ये सगळ्यांची वाहवा मिळवून गेली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीnewsबातम्या