नायगाव : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मागील काही दिवसांत विविध ठिकाणी आंदोलने झाली. या पाश्र्वभूमीवर या समाजाला आरक्षण देण्याविरोधात वसईत आदिवासी एकता परिषदेने मोर्चाचे आयोजन केले होते.
वसई तहसील कार्यालयासमोर दुपारी 1.3क् वा.च्या सुमारास हा मोर्चा घोषणा देत पोहोचला. हे आरक्षण स्वार्थापोटी असून आरक्षणात घुसखोरी करून स्वहित साधण्यासाठी प्रय} सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याखेरीज धनगर समाज, कोळी समाज व वडार समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून आदिवासींचे आरक्षण देण्यास विरोध दर्शविण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता. या खेरीज वसई तालुक्यातील आदिवासी सरकारी जागेवरील व मालकी मिळकतीतील झोपडय़ा, घरे नावे करण्यासाठी वेळोवेळी केलेल्या अर्जाबाबत कारवाईची मागणीही या निवेदनातून करण्यात आली होती.
वसईच्या विविध भागातून आदिवासी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. (वार्ताहर)