शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

आदिवासी नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा; वाढीव बील दुरूस्तीची मागणी

By नामदेव मोरे | Updated: August 25, 2023 20:27 IST

खंडीत वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे निवेदन

नवी मुंबई : श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून नवी मुंबईमधील आदिवासी नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. खंडीत केलेली विजजोडणी पुन्हा जोडण्यात यावी. वाढीव बिलांची दुरूस्ती करण्यात यावी व विजेविषयी नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

 नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान विविध ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या आदिवासी नागरिकांचे महावितरण विषयी असलेले प्रश्न सोडविण्यासाठी श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचे आयोजन केले होते. वाशीमधील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करून आदिवासींचे प्रश्न निदर्शनास आणून दिले. आतापर्यंत ७ आदिवासी नागरिकांचा विजपुरवठा खंडीत केला आहे. ३६ पेक्षा जास्त आदिवासी नागरिकांना वाढीव विजबिल पाठविण्यात आले आहे. अनेकांना वेळेवर बिले दिली जात नाहीत. दोन ते तीन महिन्यांनी नागरिकांना बिल दिले जाते. प्रत्येक मिटरधारकाच्या हातात बिल दिले जात नाही. ऐरोली यादवनगर आदिवासी कातकरी पाडा परिसरामध्ये कमी दाबाने विजपुरवठा होत आहे. आदिवासी नागरिकांच्या राहत्या घरामध्ये मिटर बसविण्यात यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली.

  महावितरण अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून संघटनेने निदर्शनास आणून दिलेले प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनामध्ये संघटनेचे राज्य उपाध्यख दत्तात्रय कोळेकर, ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, बाळू वाघे, आत्माराम वाघे, रामदास वाघे, नंदा वाघे, रेश्मा कातकरी, आरती नाईक, जयमाला जाबर,रमेश टोकरे, लक्ष्मण वाघे, रमेश वाघे व आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.