शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

तालुक्यात आदिवासींचे पाण्यासाठी जागरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:32 IST

भक्ताच्या वाडीतील नळपाणी योजनेतून वाडीत पोहोचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीमधील भक्ताच्या वाडीतील आदिवासींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर रात्र काढावी लागत होती. त्याच वाडीच्या परिसरात शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून, निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचे हित महत्त्वाचे असल्याने, स्थानिक आदिवासी पाण्यासाठी रात्रीचा दिवस करायचे. दरम्यान, तत्कालीन समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे यांनी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्पांतर्गत पाणीटंचाई निवारण कार्यक्रमामधून ३५ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर करून घेतली. त्या नळपाणी योजनेचे लोकार्पण करण्यात आल्याने भक्ताच्या वाडीत आता पाणी पोहोचले आहे.

कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भक्ताची वाडी येथील ९० आदिवासी घरांची वस्ती आहे. वाडीच्या बाहेर शासनाची शासकीय आदिवासी आश्रम शाळा असून, तेथे एक हजारहून अधिक विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. वाडीमध्ये शासकीय आश्रमशाळा असल्याने आणि आपल्या तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने, स्थानिक आदिवासी आपल्या वाडीच्या विहिरीवर पहिले प्राधान्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यामुळे मोग्रज ग्रामपंचायती मधील भक्ताची वाडीतील ग्रामस्थ बऱ्याच वर्षांपासून नळपाणीपुरवठा योजनेची मागणी करत होते. 

येथील महिला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाणी मिळावे, म्हणून आठवड्याचे नियोजन करून रात्रभर विहिरीवर नंबर लावून पाणी भरायच्या. भक्ताची वाडीमधील महिलांनी आपली व्यथा रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे यांच्या निदर्शनास आणून दिली. भक्ताची वाडीमध्ये नळाचे पाणी येणार नाही, तोवर आपण मते मागायला किंवा कोणत्याही कामासाठी, समारंभासाठी येणार नाही, असे नारायण डामसे यांनी जाहीर केले होते. 

आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी उपयोजनेतून ३५ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर करून घेतली. या नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि समाज कल्याण समितीचे माजी नारायण डामसे यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्जत पंचायत समिती सदस्या जयवंती दत्तात्रय हिंदोळा, मोगरज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुन सकपाळ, आंबिवलीचे पोलीस पाटील बाळू खेडेकर, पुरोगामी युवक संघटनेचे महेश म्हसे, अध्यक्ष प्रभाकर रसाळ, तसेच गणेश म्हसे, आंबो आगिवले, काळुराम आगिवले, किरण रसाळ, मंगेश खेडेकर, प्रकाश खेडेकर, नामदेव मराडे,  इंदुमती केवारी, अरुणा शिवाजी  सांबरी उपस्थित होते.

भक्ताचीवाडी मधील पाण्याची समस्या अनेक वर्षांपासूनची होती. त्यात महिला भगिनींनी आपल्याला पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विनंती केली असता आपण नळपाणी योजना येत नाही तोवर वाडीत येणार नाही असे आश्वासन दिले होते.ते आश्वासन पाळल्याचा आनंद असून वाडीत पाणी पोहचले हे देखील महत्त्वाचे असून आमच्या आदिवासी बांधवांना विहिरीवर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार नाही.- नारायण डामसे, सदस्य, रायगड जिल्हा परिषद 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी