शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

रेल्वे स्थानकांच्या हस्तांतराचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:13 IST

नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई शहरात हार्बर मार्गावर अत्याधुनिक रेल्वेस्थानके निर्माण करण्यात आली आहेत. रेल्वेस्थानकांमध्ये उभारलेल्या व्यावसायिक गाळ्यांचा आर्थिक फायदा सिडकोला मिळाला आहे. ही स्थानके रेल्वेकडे हस्तांतरित झाल्यास देखभाल दुरुस्तीचा खर्च रेल्वे प्रशासनाला करावा लागणार आहे. हा तिढा सुटत नसल्याने अनेक वर्षांपासून स्थानकांचे हस्तांतर रखडले आहे.

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. या शहरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा देण्याच्या दृष्टीने सिडको आणि रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तरीत्या शहरात रेल्वे सुविधा सुरू केली. यामध्ये सिडकोने रेल्वेस्थानकांची आणि स्थानकांमधील पायाभूत सुविधांची पूर्तता केली असून रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आदी सर्वच कामे रेल्वेने केली आहेत. यात ट्रान्सहार्बरसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या खारकोपरपर्यंतच्या मार्गाचाही समावेश आहे.

शहरातील रेल्वेस्थानकांची देखभाल दुरु स्ती करण्याची जबाबदारी सिडकोची असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वच रेल्वेस्थानकांत सिडकोने व्यावसायिक कार्यालये बांधली आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी वाशी आणि सीबीडी रेल्वेस्थानकांना गळती लागली आहे. गळती होणारे सांडपाणी थेट फलाटांवर पडते. अनेक पाणपोई बंद आहेत. काही ठिकाणी नळ गायब आहेत. रेल्वेस्थानकांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अत्याधुनिक रेल्वेस्थानके म्हणून नावलौकिक मिळविलेल्या स्थानकांची अग्निसुरक्षा बंद आहे. येथील स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. वाशी ते बेलापूरपर्यंतच्या स्थानकात दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात आल्या नाहीत, त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्थानक परिसरात उभारलेले कारंजे बंद आहेत. बहुतांश ठिकाणी पंखे नादुरुस्त आहेत. स्थानकांवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव असल्याने फेरीवाले स्थानकात आणि प्रवेशद्वारावरच व्यवसाय थाटत आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रेल्वे प्रशासन आणि सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. आहे. मात्र, अनेक वर्षांपासून हस्तांतराचा प्रश्न प्रलंबित असल्याने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. याचा नाहक त्रास शहरातील रेल्व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.देखभाल दुरुस्तीअभावी प्रवाशांची गैरसोयरेल्वेस्थानकांतील सोयी-सुविधा, देखभालीची जबाबदारी सिडकाची आहे. स्थानकांतील व्यावसायिक गाळ्यांचा आर्थिक फायदा करून घेतल्याने हस्तांतरित करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांनी वाद मिटवून प्रवाशांना सुविधा देण्यात यावी.- अभिजित धुरट, अध्यक्ष,नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असो.२१ व्या शतकातील शहराला साजेशी रेल्वेस्थानके नवी मुंबई शहरात बांधण्यात आली आहेत; परंतु स्थानकांमध्ये अनेक सुविधा देखभाल दुरु स्तीच्या कारणांवरून बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सिडकोने या सुविधा सुरू कराव्यात आणि प्रवासी नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी.- विजय पाटील, रेल्वे प्रवासीश्रेयवादात अडकले बोनकोडे रेल्वेस्थानकदिघा आणि बोनकोडे भागातील स्थानिक आणि एमआयडीसी भागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने दोन नवीन रेल्वेस्थानके मंजूर करण्यात आली होती. रेल्वेस्थानके निर्माण करण्यासाठी २०१३ साली सर्व्हेदेखील करण्यात आला होता. यापैकी दिघा स्थानकाचे काम सुरू झाले आहे; परंतु राजकीय श्रेयवादापोटी अद्याप बोनकोडे रेल्वेस्थानकाचे काम सुरू झाले नसून प्रवाशांची गैरसोय सुरूच आहे.

टॅग्स :localलोकल