शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीमुळे आयुक्तांची बदली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 23:49 IST

वाशीमध्ये उभारलेले १२०० बेडचे कोरोना रूग्णालय व कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामासह वैयक्तिक जनसंपर्क आयुक्तांच्या कामी आल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्यामुळे ४८ तासामध्ये मिसाळ पुन्हा महापालिकेत परतले आहेत. वाशीमध्ये उभारलेले १२०० बेडचे कोरोना रूग्णालय व कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामासह वैयक्तिक जनसंपर्क आयुक्तांच्या कामी आल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाने पाच हजारचा आकडा गाठल्यामुळे शासनाने आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची २३ जूनला तडका फडकी बदली केली. त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयश आल्यामुळे बदली केल्याची चर्चा नवी मुंबईमध्ये सुरू होती. मागील काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गणेश नाईक यांनीही मिसाळ यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी व काही सामाजीक संस्थांनीही मिसाळ यांच्याविरोधात सोशल मिडीयावरून मिसाळ यांच्याविरोधात मोहीम सुरू केली होती. यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याचे बोलले जात होते. परंतु बदली झाल्यानंतर दोन दिवस नवीन आयुक्तांनी पदभार स्विकारला नाही. या ४८ तासामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही बदली रद्द करावी असा आग्रह धरला होता. पालकमंत्र्यांनी बदलीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही मिसाळ यांच्यासाठी आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही त्यांच्या कामाविषयी समाधानी असल्याचे समजते.नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मनपा आयुक्तांनी चार स्तरीय आरोग्य यंत्रणा कार्यान्वीत केली. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामध्ये फ्लू क्लिनीक सुरू केले. वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १२०० बेडचे रूग्णालय उभारण्यात आले आहे. या रूग्णालयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही कौतुक केले होते. नवी मुंबईमध्ये रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्केवर गेले होते. या सर्व कामामुळेही बदली रद्द होण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर आयुक्तांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी समन्वय उत्तम असल्याचा फायदा झाला आहे. गुरूवारी आयुक्तांनी पुन्हा महापालिकेत येऊन कामकाज करण्यास सुरवात केली असून दिवसभर याचीच चर्चा शहरात सुरू होती.>बदली रद्द करण्यासाठी आग्रहमनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानीक नेत्यांनीही प्रयत्न केले. मिसाळ यांचे काम चांगले असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत हा विषय पोहचविण्यात आला.मिसाळ यांचेही महाविकास आघाडीसह भाजपच्या काही नेत्यांशीही चांगले संबध आहेत. मिसाळ यांच्या निवृत्तीला एक वर्ष राहिले असल्यामुळे व ते चांगले काम करत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे.बदली झाली असती तर त्याचा राजकीय फायदा माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना झाला असता हेही महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.>सर्वांना विश्वासात घेऊन कामआयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजीक संघटनांच्या मदतीने प्रतिदिन ३५ हजार नागरिकांना जेवण उपलब्ध करून दिले होते. प्रत्येकाचे म्हणने शांतपणे ऐकूण घेतात. कोरोनाची परिस्थिती संयमाने हाताळताना विनाकारण प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे बदली रद्द करण्यात आल्याची चर्चाही आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका