शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

महाविकास आघाडीमुळे आयुक्तांची बदली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 23:49 IST

वाशीमध्ये उभारलेले १२०० बेडचे कोरोना रूग्णालय व कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामासह वैयक्तिक जनसंपर्क आयुक्तांच्या कामी आल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्यामुळे ४८ तासामध्ये मिसाळ पुन्हा महापालिकेत परतले आहेत. वाशीमध्ये उभारलेले १२०० बेडचे कोरोना रूग्णालय व कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामासह वैयक्तिक जनसंपर्क आयुक्तांच्या कामी आल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाने पाच हजारचा आकडा गाठल्यामुळे शासनाने आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची २३ जूनला तडका फडकी बदली केली. त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयश आल्यामुळे बदली केल्याची चर्चा नवी मुंबईमध्ये सुरू होती. मागील काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गणेश नाईक यांनीही मिसाळ यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी व काही सामाजीक संस्थांनीही मिसाळ यांच्याविरोधात सोशल मिडीयावरून मिसाळ यांच्याविरोधात मोहीम सुरू केली होती. यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याचे बोलले जात होते. परंतु बदली झाल्यानंतर दोन दिवस नवीन आयुक्तांनी पदभार स्विकारला नाही. या ४८ तासामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही बदली रद्द करावी असा आग्रह धरला होता. पालकमंत्र्यांनी बदलीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही मिसाळ यांच्यासाठी आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही त्यांच्या कामाविषयी समाधानी असल्याचे समजते.नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मनपा आयुक्तांनी चार स्तरीय आरोग्य यंत्रणा कार्यान्वीत केली. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामध्ये फ्लू क्लिनीक सुरू केले. वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १२०० बेडचे रूग्णालय उभारण्यात आले आहे. या रूग्णालयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही कौतुक केले होते. नवी मुंबईमध्ये रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्केवर गेले होते. या सर्व कामामुळेही बदली रद्द होण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर आयुक्तांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी समन्वय उत्तम असल्याचा फायदा झाला आहे. गुरूवारी आयुक्तांनी पुन्हा महापालिकेत येऊन कामकाज करण्यास सुरवात केली असून दिवसभर याचीच चर्चा शहरात सुरू होती.>बदली रद्द करण्यासाठी आग्रहमनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानीक नेत्यांनीही प्रयत्न केले. मिसाळ यांचे काम चांगले असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत हा विषय पोहचविण्यात आला.मिसाळ यांचेही महाविकास आघाडीसह भाजपच्या काही नेत्यांशीही चांगले संबध आहेत. मिसाळ यांच्या निवृत्तीला एक वर्ष राहिले असल्यामुळे व ते चांगले काम करत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे.बदली झाली असती तर त्याचा राजकीय फायदा माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना झाला असता हेही महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.>सर्वांना विश्वासात घेऊन कामआयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजीक संघटनांच्या मदतीने प्रतिदिन ३५ हजार नागरिकांना जेवण उपलब्ध करून दिले होते. प्रत्येकाचे म्हणने शांतपणे ऐकूण घेतात. कोरोनाची परिस्थिती संयमाने हाताळताना विनाकारण प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे बदली रद्द करण्यात आल्याची चर्चाही आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका