शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पनवेलमधील २३ ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: January 12, 2017 06:29 IST

पनवेल महापालिका स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, महापालिकेत समाविष्ट

पनवेल : पनवेल महापालिका स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, महापालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींतील जवळपास ३८५ कामगारांना अद्याप पगार मिळाला नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी काही नियमबाह्य कर्मचारी भरतीचा फटका नियमित कामगारांना बसला आहे. दिवाळी अंधारात गेली आता नववर्षही अंधारातच जात असल्याची व्यथा कामगारांनी मांडली. शिवसेना या कामगारांच्या मदतीला धावली असून, उपजिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी शिष्टमंडळासह आयुक्तांना भेटून याबाबत लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तीन महिने पगार नसल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ३८५ कामगारांमध्ये क्लार्क, शिपाई, सफाई कामगार, प्लंबर, सुपरवायझर, वाहनचालक आदींचा समावेश आहे. या कामगार वर्गात आदिवासी, तसेच महिलांचाही मोठा समावेश आहे. केवळ पगारावर अवलंबून असलेल्या या वर्गाला चूल पेटवणेही कठीण झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आपली कुटुंबे गावाला पाठविली आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या वेळी सर्व देशभर मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा भासला होता. त्याचा फटका या कर्मचाऱ्यांना बसला. चलनाची कमतरता असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना उधारीने पैसे मागता आले नाहीत. यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ११ जानेवारीला पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, पनवेल तालुका संघटक दीपक निकम, खारघर शहरप्रमुख गुरु नाथ पाटील आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)