शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

पनवेलमधील २३ ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: January 12, 2017 06:29 IST

पनवेल महापालिका स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, महापालिकेत समाविष्ट

पनवेल : पनवेल महापालिका स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, महापालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींतील जवळपास ३८५ कामगारांना अद्याप पगार मिळाला नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी काही नियमबाह्य कर्मचारी भरतीचा फटका नियमित कामगारांना बसला आहे. दिवाळी अंधारात गेली आता नववर्षही अंधारातच जात असल्याची व्यथा कामगारांनी मांडली. शिवसेना या कामगारांच्या मदतीला धावली असून, उपजिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी शिष्टमंडळासह आयुक्तांना भेटून याबाबत लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तीन महिने पगार नसल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ३८५ कामगारांमध्ये क्लार्क, शिपाई, सफाई कामगार, प्लंबर, सुपरवायझर, वाहनचालक आदींचा समावेश आहे. या कामगार वर्गात आदिवासी, तसेच महिलांचाही मोठा समावेश आहे. केवळ पगारावर अवलंबून असलेल्या या वर्गाला चूल पेटवणेही कठीण झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आपली कुटुंबे गावाला पाठविली आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या वेळी सर्व देशभर मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा भासला होता. त्याचा फटका या कर्मचाऱ्यांना बसला. चलनाची कमतरता असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना उधारीने पैसे मागता आले नाहीत. यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ११ जानेवारीला पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, पनवेल तालुका संघटक दीपक निकम, खारघर शहरप्रमुख गुरु नाथ पाटील आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)