शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

टाटा यार्डमधील माथाडींवर उपसामारीची वेळ, यार्ड भाड्याने दिल्याने कामच मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:24 IST

कळंबोली येथील टाटा स्टील यार्ड हे दुसऱ्या दोन कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने या ठिकाणी काम करणा-या ३७५ माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : येथील टाटा स्टील यार्ड हे दुसऱ्या दोन कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने या ठिकाणी काम करणा-या ३७५ माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला कामच मिळत नसल्याने उदरनिर्वाह करायचा कसा? हा प्रश्न या कामगारांनी उपस्थित केला आहे.लोह-पोलाद मार्केटच्या बाजूला टाटा स्टील कंपनीने २८ एकरांवर यार्ड तयार केले होते. सिडकोकडून लीजवर जागा घेऊन कंपनीने येथे स्टील यार्ड तयार केले होते. जमशेदपूर येथून वॅगने हा माल कळंबोलीतील यार्डमध्ये येत होता. येथून तो माल इतर ठिकाणी पाठवला जात असे. त्यामुळे येथे माथाडींना चांगला रोजगार मिळत असे. कळंबोलीत राहणारे ५०० पेक्षा जास्त जण येथे काम करीत होतो; परंतु २००१ मध्ये टाटा कंपनीने या ठिकाणची लोखंडाची ने-आण बंद केली आणि ही जागा आय. के. मरिन व गेट वे अ‍ॅन रेल्वे यांना संयुक्त भागीदारीत भाडेतत्त्वावर दिली. ते देतअसताना माथाडी कामगारांना जास्तीत जास्त काम ही कंपनी देईलअसे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात आमच्या पदरात काहीच पडले नसल्याचे बंडू धायगुडे यांनी सांगितले. त्या वेळी कामगारांनी आंदोलनसुद्धा केले, त्याची दखल घेत जमशेदपूर येथून कंपनीचे प्रतिनिधी येथे आले आणि त्यांची माथाडी बोर्डावर बैठक झाली. मात्र, दिलेल्या आश्वासनाची १८ वर्षांनंतरही पूर्तता झाली नसल्याची माहिती राम महानवर यांनी दिली.ज्या कंपनीला ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे, ते येथे कंटनेर यार्ड तसेच इतर कामासाठी त्याचा वापर करीत आहेत. प्रत्यक्षात माल या यार्डात उतरत नाही त्यामुळे ३७५ कुटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रश्न कळंबोलीतील स्थानिक नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांनी गेल्या दोन वर्षांपासून हाती घेतला आहे.जवळपास १८ वर्षांपासून आपल्या हातांना काम मिळेल या आशेवर माथाडी कामगार आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. टाटा आणि आय के मरिन या कंपनीची उच्चस्तरीय बैठक लावण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरूच ठेवणार आहे.- मोनिका प्रकाश महानवर,नगरसेविका, पनवेल महापालिकाआमच्या कंपनीलाही या ठिकाणी काम करायचे आहे. त्या दृष्टिकोनातून संचालक टाटा स्टील कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाली तर येथे मोठ्या प्रमाणात मालाची चढ-उतार होईल आणि माथाडी कामगारांना कामसुद्धा मिळेल.- शत्रुघ्न देशमुख,- पर्यवेक्षक, आय के मरिन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई