शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

टाटा यार्डमधील माथाडींवर उपसामारीची वेळ, यार्ड भाड्याने दिल्याने कामच मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:24 IST

कळंबोली येथील टाटा स्टील यार्ड हे दुसऱ्या दोन कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने या ठिकाणी काम करणा-या ३७५ माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : येथील टाटा स्टील यार्ड हे दुसऱ्या दोन कंपनीला भाडेतत्त्वावर दिल्याने या ठिकाणी काम करणा-या ३७५ माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला कामच मिळत नसल्याने उदरनिर्वाह करायचा कसा? हा प्रश्न या कामगारांनी उपस्थित केला आहे.लोह-पोलाद मार्केटच्या बाजूला टाटा स्टील कंपनीने २८ एकरांवर यार्ड तयार केले होते. सिडकोकडून लीजवर जागा घेऊन कंपनीने येथे स्टील यार्ड तयार केले होते. जमशेदपूर येथून वॅगने हा माल कळंबोलीतील यार्डमध्ये येत होता. येथून तो माल इतर ठिकाणी पाठवला जात असे. त्यामुळे येथे माथाडींना चांगला रोजगार मिळत असे. कळंबोलीत राहणारे ५०० पेक्षा जास्त जण येथे काम करीत होतो; परंतु २००१ मध्ये टाटा कंपनीने या ठिकाणची लोखंडाची ने-आण बंद केली आणि ही जागा आय. के. मरिन व गेट वे अ‍ॅन रेल्वे यांना संयुक्त भागीदारीत भाडेतत्त्वावर दिली. ते देतअसताना माथाडी कामगारांना जास्तीत जास्त काम ही कंपनी देईलअसे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात आमच्या पदरात काहीच पडले नसल्याचे बंडू धायगुडे यांनी सांगितले. त्या वेळी कामगारांनी आंदोलनसुद्धा केले, त्याची दखल घेत जमशेदपूर येथून कंपनीचे प्रतिनिधी येथे आले आणि त्यांची माथाडी बोर्डावर बैठक झाली. मात्र, दिलेल्या आश्वासनाची १८ वर्षांनंतरही पूर्तता झाली नसल्याची माहिती राम महानवर यांनी दिली.ज्या कंपनीला ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे, ते येथे कंटनेर यार्ड तसेच इतर कामासाठी त्याचा वापर करीत आहेत. प्रत्यक्षात माल या यार्डात उतरत नाही त्यामुळे ३७५ कुटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रश्न कळंबोलीतील स्थानिक नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांनी गेल्या दोन वर्षांपासून हाती घेतला आहे.जवळपास १८ वर्षांपासून आपल्या हातांना काम मिळेल या आशेवर माथाडी कामगार आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. टाटा आणि आय के मरिन या कंपनीची उच्चस्तरीय बैठक लावण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरूच ठेवणार आहे.- मोनिका प्रकाश महानवर,नगरसेविका, पनवेल महापालिकाआमच्या कंपनीलाही या ठिकाणी काम करायचे आहे. त्या दृष्टिकोनातून संचालक टाटा स्टील कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाली तर येथे मोठ्या प्रमाणात मालाची चढ-उतार होईल आणि माथाडी कामगारांना कामसुद्धा मिळेल.- शत्रुघ्न देशमुख,- पर्यवेक्षक, आय के मरिन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई