शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावर उत्पन्नापेक्षा तिप्पट खर्च

By admin | Updated: March 3, 2016 02:56 IST

पाणी वितरणासाठी येणारा खर्च हा नागरिकांकडून पाणी बिलातून कररूपाने संकलित झाला पाहिजे, असे केंद्र व राज्य शासनाचे निकष आहेत

नामदेव मोरे,  नवी मुंबईपाणी वितरणासाठी येणारा खर्च हा नागरिकांकडून पाणी बिलातून कररूपाने संकलित झाला पाहिजे, असे केंद्र व राज्य शासनाचे निकष आहेत. परंतु पनवेल नगरपालिकेने पाण्यासाठी तिजोरीची दारे सताड उघडी ठेवली असून, उत्पन्नापेक्षा तिप्पट जास्त खर्च केला जात आहे. यावर्षी आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांनीही पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. राज्यातील सर्वच शहरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्वमालकीचे धरण असल्याने २४ तास पाणी देणाऱ्या नवी मुंबईमध्येही यावर्षी पहिल्यांदाच पाणीकपात करण्याची वेळ आली. १६४ वर्षांची परंपरा असणाऱ्या पनवेल नगरपालिका क्षेत्रामध्येही तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. केंद्र व राज्य शासनाने पाणीवाटपाविषयी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. पाणी वितरण प्रणालीसाठी जेवढा खर्च होतो तेवढे पैसे पाणीकरातून उपलब्ध झाले पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. परंतु पनवेलमधील वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेने नवीन स्रोत निर्माण करण्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामुळे शेजारील नवी मुंबई महानगरपालिकेने धरण विकत घेतले, परंतु नगरपालिकेने मात्र पाणी विकत घेण्यालाच प्राधान्य दिले. त्याचे गंभीर परिणाम आता शहरवासीयांना भोगावे लागत आहेत. २००९-१० पासून सात वर्षांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ६९ कोटी २५ लाख ७४५० रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नागरिकांकडून पाणीबिलातून फक्त २४ कोटी ५६ लाख ९९ हजार ५६३ रुपये जमा झाले आहेत. एकूण उत्पन्नापेक्षा पाण्यापासून मिळणारे उत्पन्न फक्त चार टक्के आहे, परंतु खर्च मात्र तब्बल १२ टक्के आहे. उत्पन्नापेक्षा खर्च तिप्पट होऊ लागला आहे. पाणी वितरणासाठी खर्च वाढत असला तरी नगरपालिकेने कधीच कंजुषी केली नाही. पाण्यासाठी तिजोरीची दारे सताड उघडीच ठेवली आहेत, परंतु यावर्षी सर्वत्रच टंचाई असल्यामुळे एकदिवसाआड पाणी वितरित केले जात आहे. शहरवासीयांना प्रतिमाणसी २५० ते २६० लिटर पाणी दिले जात होते. आता हे प्रमाण १२५ ते १५० लिटरवर आले आहे. नगरपालिका एमआयडीसी, सिडको व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेत आहे. एक हजार लिटरसाठी साडेनऊ रुपये खर्च करावा लागत आहे. हेच पाणी नागरिकांना अडीच ते तीन रुपये दराने द्यावे लागत आहे. गतवर्षीपर्यंत ९५० रुपये फ्लॅट रेट दराने पाणी दिले जात होते. आता हे दर १,५०० रुपये करण्यात आले आहेत; तरीही उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासनही पाण्यावरील आवश्यक तो खर्च करीत आहेत. परंतु यावर्षी पाणीच नसल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाण्याची उधळपट्टी थांबवावी, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. पनवेलवासीयांना पुरेसे पाणी मिळेल एवढा पाण्याचा स्रोत नगरपालिकेकडे नाही. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी व सिडकोकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. गतवर्षी पाणी विकत घेण्यासाठी ८ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. पुढील वर्षांच्या अर्थसंकल्पामध्येही सहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नगरपालिका जवळपास ९.५० रुपये दराने पाणी विकत घेत आहे. परंतु नागरिकांना मात्र ३.५० ते ४ रुपये दराने वितरीत केले जात आहे. यामुळेही उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाच विहिरी स्वच्छ करून घेतल्या आहेत. पाणीगळती कमी करण्यावर भर दिला आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याविषयी ठोस पावले उचलली जात आहेत. नागरिकांना पाणी वाचविण्याचे आवाहन केले जात असून, भविष्यात शहरात सर्व नळजोडणीधारकांना मीटर बसविण्याची योजना आहे. - मंगेश चितळे,मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका.