शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पोटासाठी हजारो आदिवासींचे स्थलांतर सुरू

By admin | Updated: November 24, 2015 01:35 IST

मागेल त्याला त्याच्याच गावात काम, असा नारा राज्य आणि केंद्र सरकार देत असले तरी आदिवासीबहुल डहाणू तालुक्यात शेतातील भाताच्या कापणीनंतर या परिसरातील

शौकत शेख, डहाणूमागेल त्याला त्याच्याच गावात काम, असा नारा राज्य आणि केंद्र सरकार देत असले तरी आदिवासीबहुल डहाणू तालुक्यात शेतातील भाताच्या कापणीनंतर या परिसरातील हजारो मजुरांच्या हाती रोजंदारीची कामे नसल्याने या मजुरांचे गेल्या सात-आठ दिवसांपासून शहरांकडे स्थलांतर सुरू आहे. येथील आदिवासी टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी व मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर रोजगारासाठी वीटभट्टी तसेच इमारत बांधकाम व्यावसायिकांकडे धाव घेत असतात.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती असून येथे एक लाख जॉबधारक असलेल्या मजुंराची नोंद आहे. साधारणत: जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यांपासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. त्यात, मधल्या काळात म्हणजेच दिवाळीनंतर हाताला कामे नसल्याने या भागातील आदिवासी मजुरांना पोराबाळांसह कामाच्या शोधात ठाणे, मुंबई, भिवंडी, वसई, पालघर तसेच गुजरात राज्याच्या उमरगाव, संजाण, भिलाड येथे स्थलांतर करावे लागते. स्थलांतरित कुटुंबे शासनाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत रानभाज्या विकून आणि शेतात मजुरीवर काबाडकष्ट करून मुलाबाळांचे संगोपन करून उदरनिर्वाह करीत असतात. तर, दिवाळी झाल्यानंतर रोजगारासाठी शहराकडे जावे लागते.सन २००७-२००८ पासून महाराष्ट्रात ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेच्या मागे शासनाचा मूळ उद्देश ग्रामीण व दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना गावातल्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, रोजगाराकरिता शहराकडे होणारे स्थलांतर थांबविणे, तर मागेल त्याला काम व कामाप्रमाणे दाम देऊन ग्रामीण भागातील कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारु शकते.