शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील साडेतीन हजार अभियंते ‘अस्वस्थ’

By admin | Updated: July 12, 2016 03:12 IST

नालेसफाई घोटाळ्यानंतर आता रस्ते घोटाळा प्रकरणातही अभियंत्यांना अटक झाल्याने मुंबई महापालिकेतील अभियंत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़ कोणत्याही

मुंबई : नालेसफाई घोटाळ्यानंतर आता रस्ते घोटाळा प्रकरणातही अभियंत्यांना अटक झाल्याने मुंबई महापालिकेतील अभियंत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़ कोणत्याही घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारी नामानिराळे राहत असून अभियंत्यांच्याच गळ्याभोवती फास आवळला जात असल्याने अभियंतावर्ग हवालदिल झाला आहे़ त्यामुळे अभियंत्यांनी आपली ताकद दाखवून देण्यासाठी २० जुलैपासून काम बंद आंदोलनाची तयारी केली आहे़ याचा फटका अत्यावश्यक सेवांनाही बसण्याची शक्यता आहे़रस्ते, पाणी, शहर नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, इमारत प्रस्ताव अशा सर्व विभागांची सूत्रे अभियंत्यांच्या हाती असतात़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही दुर्घटना अथवा घोटाळ्यानंतर वातावरण निवळण्यासाठी अभियंत्यांनाच सुळावर चढविले जात असल्याचा आरोप अभियंत्यांकडून होऊ लागला आहे़ सध्या गाजत असलेल्या रस्ते घोटाळ्यात दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरूडकर आणि रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार यांना अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणाचे तीव्र पडसाद अभियंत्यांमध्ये उमटू लागले आहेत़ एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच त्यात वरिष्ठ अधिकाऱ्याचे पद धोक्यात आल्यास अभियंत्यांना निलंबित केले जाते़ (प्रतिनिधी)अत्यावश्यक सेवांना टाळे : मुंबई महापालिकेच्या प्रमुख विभागांची सूत्रे अभियंत्यांकडे असतात़ महापालिकेत चार हजार तीनशे अभियंते आहेत़ अत्यावश्यक पाणी खात्यातही अभियंताच प्रमुख आहे़ त्यामुळे संतप्त अभियंत्यांनी काम बंद आंदोलन पुकारून अत्यावश्यक सेवांनाच टाळे लावण्याचा इशारा दिला आहे़ अभियंत्यांनी आझाद मैदानावर आज मोर्चा आणून आपली नाराजी दाखवून दिली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता कृती समितीचे पदाधिकारी यशवंत धुरी यांनी सांगितले़दोन अभियंत्यांच्या अटकेविरोधात निदर्शनेमुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रस्ते विभागामधील घोटाळ्याप्रकरणी दोन अभियंत्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता संयुक्त कृती समितीने सोमवारी आझाद मैदानात निदर्शने केली. दोन्हीही अभियंत्यांवर कोणतेही आरोपपत्र प्रशासनाने ठेवलेले नसून त्यापूर्वीच त्यांना अटक केल्याचा निषेध करत प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न कृती समितीने सुरू केला आहे. समितीने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने चौकशीसाठी अशोक पवार आणि उदय मुरुडकर या दोन अभियंत्यांना निलंबित केलेले आहे. मात्र त्यांच्या निलंबनाचा आधार घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान प्रत्येक रोडवर केवळ एक किंवा दोनच खड्डे घेतले गेलेले असून, निरीक्षण खड्डे हे आयआरसीच्या मानकाप्रमाणे नाहीत. त्यामुळे त्याआधारे कामामध्ये त्रुटी राहिल्या आहेत, असे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. प्रत्यक्षात अभियंत्यांबाबतची चौकशी प्रथम महापालिकेमार्फत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. महापालिकेच्या चौकशीत जे निष्कर्ष समोर येतील, त्यावर महापालिकेतील सेवा नियमानुसार कारवाई होण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे. मात्र प्रशासनाच्या बेजबाबदार कृतीमुळे महापालिकेतील अभियंते चुकीच्या पद्धतीने पोलिसांच्या कारवाईमध्ये भरडले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे दिवसरात्र काम करणाऱ्या अभियंत्यांचे मनोबल खच्ची होणार आहे.राजकीय साठमारीमध्ये अभियंत्यांना वेठीला धरू नये, असे आवाहन कृती समितीने केले आहे. नाहीतर अभियंत्यांनी उत्स्फूर्त आंदोलन केल्यावर मुंबईतील नागरी सुविधा बाधित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा कृती समितीने दिला आहे.रस्ते घोटाळ्याच्या चौकशीत काय?रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळून आले होते़ ३५२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने केली आहे़ मात्र ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही त्यांना करोडो रुपयांचे कंत्राट मिळाले़ उच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणीनंतर हे कंत्राट रद्द केले़, तर रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे़ या अधिकाऱ्यांची घोटाळ्यात भूमिका काय, किती कोटींचा त्यांनी अपहार केला, हे चौकशीतून पुढे येण्याआधीच ही कारवाई झाल्याचा आरोप कृती समितीने केला आहे़