शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने ये-जा करणाऱ्या भाविकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 21:35 IST

तिकीटापेक्षा ज्यादा रकमेच्या वसुलीमुळे भाविक संतप्त : मोरा बंदरात प्रवासी बोट चिखलात रुतून बसल्यामुळे भाविकांचे हाल

मधुकर ठाकूर/ उरण :  महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे.संध्याकाळी ४ नंतर तर काही बोटी उरण-मोरा बंदरातच चिखलात रुतून बसल्यामुळे आणि ठरवुन दिलेल्या एकेरी ६५ रुपये तिकीट ऐवजी बोट चालकांकडून ७०-८० वसुल केल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही आणखीनच कमी झाली आहे.प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र हजारो शिवभक्तांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरवर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात वाढ केली जात असल्याने बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होत चालली आहे.याबाबत खंत आणि चिंता व्यक्त करून भाविकांना कमी खर्चात दर्शन घडविण्यासाठी यावर्षी तिकिट दर कमी करण्याची  विनंती घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी प्रादेशिक बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती.

  ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर महाशिवरात्रीला बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून तिकिट दरात कोणत्याही प्रकारची वाढ न करता यावर्षीही सुमारे ३०० ते ५०० प्रवासी वाहतूक क्षमतेच्या सहा मच्छीमार बोटींची व्यवस्था केली होती.यासाठी बंदर विभागाने एकेरीसाठी ६५ तर दुहेरी परतीच्या प्रवासासाठी १३० असा तिकीट तिकीट दर ठरवून दिला होता.मात्र तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही  बोट चालकांकडून एकेरीसाठी ७०-८० तर परतीच्या प्रवासासाठी १४०-१६० रुपयांपर्यंत  मनमानीपणे तिकीट दर आकारणी करीत होते.त्याशिवाय तिकिटही दिले जात नव्हते.बोटचालकांच्या मनमानी तिकीट दर वसुलीमुळे मात्र महाशिवरात्री निमित्ताने बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून येत आहे.तिकिट दर ठरवून दिल्यानंतरही बोटचालक बंदर, पोलिस व इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगत मनमानीपणे पैसे वसूल करीत होते.मात्र बोट चालकांचा मनमानी कारभार आणि त्यांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांबद्दल भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 महाशिवरात्री निमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती.मात्र राजबंदर जेट्टीवरुन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या भाविकांना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.राजबंदर जेट्टीवर संध्याकाळी ४ नंतर प्रशासनाचे नियोजन ढासळल्याने जेएनपीए व उरण- मोराकडे निघालेल्या भाविकांना एका बोटीवरुन दुसऱ्या बोटीवर जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.या गोंधळामुळे जेएनपीटीकडे जाणारे भाविक मोरा बोटीत तर मोरा बंदराकडे जाणारे भाविक जेएनपीटीच्या बोटीत अडकून पडल्याने महिला, आबालवृद्धांचे अतोनात हाल झाले.

हा गोंधळ संपतो ना संपतो तोपर्यंत समुद्रातील ओहटीमुळे मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी व बोटी लागण्यासाठी पाणीच नसल्याने बंदर अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात भाविकांना सोडण्यासाठी निघालेल्या काही बोटी मोरा बंदरापासून अर्धा किमी अंतरावर चिखलात रुतून बसल्या होत्या.मोठ्या मुश्किलीने खचाखच भाविकांनी भरलेल्या राम अयोध्या आणि जय गणेश या बोटी बंदरापर्यत पोहचल्या खऱ्या. मात्र  बंदरात पुरेश्या प्रमाणात पाणी नसल्याने मात्र मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी मोठ्या शेकडो भाविकांसह बोट चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागली.प्रशासनाचा ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराबाबत मात्र  शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई