शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने ये-जा करणाऱ्या भाविकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 21:35 IST

तिकीटापेक्षा ज्यादा रकमेच्या वसुलीमुळे भाविक संतप्त : मोरा बंदरात प्रवासी बोट चिखलात रुतून बसल्यामुळे भाविकांचे हाल

मधुकर ठाकूर/ उरण :  महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे.संध्याकाळी ४ नंतर तर काही बोटी उरण-मोरा बंदरातच चिखलात रुतून बसल्यामुळे आणि ठरवुन दिलेल्या एकेरी ६५ रुपये तिकीट ऐवजी बोट चालकांकडून ७०-८० वसुल केल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही आणखीनच कमी झाली आहे.प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र हजारो शिवभक्तांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरवर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात वाढ केली जात असल्याने बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होत चालली आहे.याबाबत खंत आणि चिंता व्यक्त करून भाविकांना कमी खर्चात दर्शन घडविण्यासाठी यावर्षी तिकिट दर कमी करण्याची  विनंती घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी प्रादेशिक बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती.

  ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर महाशिवरात्रीला बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून तिकिट दरात कोणत्याही प्रकारची वाढ न करता यावर्षीही सुमारे ३०० ते ५०० प्रवासी वाहतूक क्षमतेच्या सहा मच्छीमार बोटींची व्यवस्था केली होती.यासाठी बंदर विभागाने एकेरीसाठी ६५ तर दुहेरी परतीच्या प्रवासासाठी १३० असा तिकीट तिकीट दर ठरवून दिला होता.मात्र तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही  बोट चालकांकडून एकेरीसाठी ७०-८० तर परतीच्या प्रवासासाठी १४०-१६० रुपयांपर्यंत  मनमानीपणे तिकीट दर आकारणी करीत होते.त्याशिवाय तिकिटही दिले जात नव्हते.बोटचालकांच्या मनमानी तिकीट दर वसुलीमुळे मात्र महाशिवरात्री निमित्ताने बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून येत आहे.तिकिट दर ठरवून दिल्यानंतरही बोटचालक बंदर, पोलिस व इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगत मनमानीपणे पैसे वसूल करीत होते.मात्र बोट चालकांचा मनमानी कारभार आणि त्यांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांबद्दल भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 महाशिवरात्री निमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती.मात्र राजबंदर जेट्टीवरुन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या भाविकांना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.राजबंदर जेट्टीवर संध्याकाळी ४ नंतर प्रशासनाचे नियोजन ढासळल्याने जेएनपीए व उरण- मोराकडे निघालेल्या भाविकांना एका बोटीवरुन दुसऱ्या बोटीवर जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.या गोंधळामुळे जेएनपीटीकडे जाणारे भाविक मोरा बोटीत तर मोरा बंदराकडे जाणारे भाविक जेएनपीटीच्या बोटीत अडकून पडल्याने महिला, आबालवृद्धांचे अतोनात हाल झाले.

हा गोंधळ संपतो ना संपतो तोपर्यंत समुद्रातील ओहटीमुळे मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी व बोटी लागण्यासाठी पाणीच नसल्याने बंदर अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात भाविकांना सोडण्यासाठी निघालेल्या काही बोटी मोरा बंदरापासून अर्धा किमी अंतरावर चिखलात रुतून बसल्या होत्या.मोठ्या मुश्किलीने खचाखच भाविकांनी भरलेल्या राम अयोध्या आणि जय गणेश या बोटी बंदरापर्यत पोहचल्या खऱ्या. मात्र  बंदरात पुरेश्या प्रमाणात पाणी नसल्याने मात्र मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी मोठ्या शेकडो भाविकांसह बोट चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागली.प्रशासनाचा ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराबाबत मात्र  शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई