शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मुली अद्यापही सुधारगृहातच

By admin | Updated: September 14, 2015 04:11 IST

नेरूळ पोलिसांनी आग्य्राच्या कुंटणखान्यातून नाट्यमयरीत्या सुटका केलेल्या त्या पाच मुलींच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही.

नवी मुंबई : नेरूळ पोलिसांनी आग्य्राच्या कुंटणखान्यातून नाट्यमयरीत्या सुटका केलेल्या त्या पाच मुलींच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे या पीडित मुलींना मागील महिन्याभरापासून सुधारगृहातच राहावे लागत आहे. तर त्यांच्या पालकांचा शोध लागलेला नसून सामाजिक संस्थांनी देखील पुनर्वसनासाठी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.आग्रा येथील कश्मिरी बाजार परिसरातील कुंटणखान्यावर नेरूळ पोलिसांनी नाट्यमयरीत्या छापा टाकून २१ मुलींची सुटका केलेली आहे. या मुलींना देशभरातील विविध ठिकाणावरुन पळवून आणल्यानंतर त्यांच्याकडून देहविक्री करुन घेतली जात होती. त्यापैकी पाच मुली महाराष्ट्रातील आहेत. त्यानुसार इतर राज्यातील मुली संबंधित पोलिसांच्या ताब्यात देवून नेरुळ पोलिसांनी पाच मुलींना महाराष्ट्रात आणले होते. या पीडित मुली पुणे, कल्याण, लातूर व उस्मानाबादच्या राहणाऱ्या आहेत. त्यांच्यावर एक ते सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार सुरु होता. तर प्रयत्न करूनही नरकयातनेतून त्यांची सुटका होत नव्हती. अखेर नेरुळ पोलिसांनी त्यांची सुटका केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा शोध महत्त्वाचा होता. त्यानुसार मुलींनी राहत्या ठिकाणाची माहिती दिल्यानंतर संबंधित पोलिसांना नेरुळ पोलिसांनी पत्र पाठवून या प्रकाराची माहिती दिलेली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही पाचही मुलींच्या राहत्या ठिकाणच्या पोलिसांकडून प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे या मुलींच्या कुटुंबातील व्यक्तींचा शोधात नेरुळ पोलिसांनाच जंग पछाडावी लागणार आहे.पालकांचा शोध लागल्यानंतरही ते मुलींना स्वीकारतील का, असाही प्रश्न पोलिसांना सतावत आहे. यामुळे पाचही मुलींच्या पुनर्वसनासाठी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील नेरुळ पोलिसांनी केले होते. यानंतरही कोणतीच संस्था पुढे न आल्याने आग्रा येथून सुटका झालेल्या मुलींना सुधारगृहातच खितपत राहावे लागत आहे.नरकयातना सोसल्यानंतर कुटुंबीयांकडे परत देण्याऐवजी पुनर्वसन व्हावे अशी त्या मुलींनी इच्छा आहे. परंतु ऐरवी महिलांवरील अत्याचाराविषयी गळा काढणाऱ्या एकाही समाजसेवी संस्थेने त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे सुधारगृहाशी संलग्न समाजसेवकांच्या भूमिकेवर त्यांची नजर लागली आहे. (प्रतिनिधी)