शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

साडेतीन हजार फेरीवाल्यांची झाली नोंद

By admin | Updated: November 13, 2014 22:55 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून आणि राज्य शासनाच्या सूचनेवरून राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणावयाचे आहे.

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून आणि राज्य शासनाच्या सूचनेवरून राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणावयाचे आहे. या अंतर्गत केल्या जाणा:या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षण प्रक्रियेचा आढावा घेता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क, ग आणि फ या तीन प्रभागांचे सर्वेक्षण पुर्ण झाले असून यात एकुण साडेतीन हजार फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत देशातील सर्व स्थानिक स्वराज्य स्थानिक संस्थांनी उपविधी तयार करून त्याप्रमाणो कार्यवाही करावयाची आहे. या अनुषंगाने केडीएमसीने महापौर यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समिती स्थापन करून प्रभाग स्तरावर पार पडलेल्या बैठकांमध्ये उपविधी तयार केली गेली होती.परंतू न्यायालयाच्या आदेशानुसार महापौर यांच्या अध्यक्षतेखालील सर्व समित्या बरखास्त करून त्या आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नेमून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या आहेत. या धोरणांतर्गत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून केडीएमसीने फेरीवाला सर्वेक्षणाचे काम अॅबल सॉफ्टवेअर या संस्थेला दिले आहे. मध्यंतरी या सर्वेक्षणाला फेरीवाला संघटनांनी आक्षेप घेतला होता. संघटनांना विश्वासात न घेता परस्पर सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून सर्वेक्षण करणारी संस्था ही बाहेरची असल्याने त्यांना स्थानिकांची कल्पना नाही त्यामुळे मुळ फेरीवाला या नोंदणी प्रक्रियेत वंचित राहण्याची शक्यता असल्याने घुसखोरांची नोंद होण्याची भीती काही फेरीवाला संघटनांकडुन व्यक्त करण्यात आली होती. हे आरोप फेटाळून लावताना प्रभागातील पथकप्रमुखाला सोबत घेऊनच सर्वेक्षण केले जात असल्याचा दावा या संस्थेमार्फत करण्यात आला होता. दरम्यान संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात केडीएमसीच्या 7 प्रभागांपैकी 3 प्रभागांमधील सर्वेक्षण पुर्ण झाले असून उर्वरीत 4 प्रभागांचा सर्वे देखील लवकरच पुर्ण होईल अशी माहीती अॅबल सॉफ्टवेअरचे संस्थाचालक जयदीप वैराळ यांनी दिली.  (प्रतिनिधी)