शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मुंबईचा विकास आराखडाच नाही

By admin | Updated: November 24, 2015 01:42 IST

सुनियोजित शहराचा दावा करणाऱ्या नवी मुंबईचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही. १९९७ ला सर्वप्रथम विकास आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता

नवी मुंबई : सुनियोजित शहराचा दावा करणाऱ्या नवी मुंबईचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही. १९९७ ला सर्वप्रथम विकास आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु नंतर १५ गावे वगळल्यामुळे पुन्हा नव्याने तयारी करावी लागली. गत १८ वर्षांमध्ये प्राथमिक तयारीच सुरू असून विकास आराखडा तयार करण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सभागृह नेते जयवंत सुतार यांनी सर्वसाधारण सभेमध्ये विकास आराखड्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला आयुक्तांनी दिलेल्या उत्तरातून अद्याप आराखड्याची प्राथमिक तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील नियोजनबद्ध विकास केलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. महानगरपालिकेला मलनि:सारण, पाणीपुरवठा, स्वच्छता, एनएमएमटी, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रामधील राज्य व देशपातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. महापालिकेच्या प्रत्येक प्रकल्पात शहराच्या सुनियोजित विकासाचा आवर्जून उल्लेख असतो. परंतु प्रत्यक्षात मात्र शहराच्या नियोजित विकासासाठी आवश्यक असणारा आराखडाच महापालिकेला बनविता आलेला नाही. सिडकोच्या जुन्या आराखड्यावरच आतापर्यंत काम सुरू आहे. पालिकेचे स्वत:चे असे नियोजनच नाही. भविष्याचा विचार करून शहरातील रस्ते, उद्यान, वाहनतळ व इतर सामाजिक कामांसाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु अत्यंत महत्त्वाच्या या विषयाकडेच आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने आॅगस्ट १९९७ मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये याविषयीचा प्रस्ताव मंजूर केला होता. दहिसर परिसरातील १५ गावांसाठी विकास योजना तयार करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या. परंतु आराखड्यासाठी इरादा जाहीर करण्यासाठी ९ वर्षांचा कालावधी लागला. मार्च २००६ मध्ये अधिसूचना काढण्यात आली. परंतु याच दरम्यान दहिसर परिसरातील १४ गावांनी महापालिकेमधून वगळण्याची मागणी केली. यासाठी आंदोलन सुरू केले. अखेर शासनाने ही गावे पालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला. यामुळे विकास आराखड्यासाठीच्या प्रयत्नांनाही खीळ बसली. यासाठी सप्टेंबर २००७ मध्ये पुन्हा अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर विकास आराखडा तयार करण्यासाठीचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी बेस मॅप तयार करणे, विद्यमान जमीन वापराचा नकाशा तयार करण्यासाठी सर्वेक्षण करणे लोकसंख्या प्रक्षेपण, नियोजन प्रमाणांकाचे निश्चितीकरण करणे इत्यादी आवश्यक कामे करण्यात आली आहेत. जुलै २००८ च्या शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे घणसोली नोडचे नियोजन प्राधिकरणाचे अधिकारही महापालिकेस प्राप्त झाले आहेत. महापालिकेच्या प्रारूप आराखड्याची व्याप्ती लक्षात घेता मुंबईसह इतर महापालिकांच्या धर्तीवर या कामासाठी खाजगी तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याचे विचाराधीन आहे. सर्वसाधारण सभेने यासाठी खाजगी संस्थेची मदत घेण्याच्या प्रस्तावास मंजुरीही दिली आहे. खाजगी संस्थेची नियुक्ती करण्याचे काम सुरू असून त्यानंतर विकास योजनेचे काम गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे उत्तर आयुक्तांनी दिले आहे.