शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

निर्यात नाही, भाव कोसळले, कांदा आणतोय डोळ्यात पाणी

By नामदेव मोरे | Updated: March 4, 2023 09:39 IST

शेतकऱ्यांचे नुकसान : वारंवार निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कांदा निर्यातीवर शासन वारंवार निर्बंध लादत असल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होऊ लागला आहे. अस्थिर वातावरणामुळे भारतीय कांद्याची मागणी घटत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. २०१२-१३ मध्ये देशातून तब्बल १६ लाख ६६ हजार टन कांदा निर्यात झाला होता. दहा वर्षानंतर २०२१-२२ मध्ये फक्त १५ लाख ३७ हजार टन कांदा निर्यात झाला आहे. दहा वर्षांनंतरही अपेक्षित निर्यातवाढ झालेली नसल्यामुळे उत्पादन वाढल्यावर देशातील भाव कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. 

देशात कांद्याचे उत्पादन वाढले असून, बाजारभाव कोसळू लागले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नाही. शेतकरी हतबल झाला असून, कांदा फेकून द्यायची वेळ आली आहे.  चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची टीका होत आहे. 

भारतीय कांद्याला जगभर मागणीभारतीय कांद्याला जगभर मागणी आहे. परंतु जगभरातून मागणी वाढली की देशातून निर्यातबंदी होत असते. निर्यातीवर वारंवार बंधने लादली जात असल्यामुळे त्याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला आहे. यामुळे अनेक देशांनी भारतीय कांद्यावर अवलंबून न राहता इतर पर्यायांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. भारतामधून यूएई, इंडोनेशिया, कतार, कुवेत, सौदी अरब या देशांमध्ये होणारी निर्यात कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी भारतामधून १६ लाख ६६ हजार टन कांद्याची निर्यात होत होती. दहा वर्षात एक लाख २९ हजार टन निर्यात घटली आहे. शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप कमी करावा. निर्यातवाढीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप थांबविला पाहिजे. वारंवार निर्यातबंदी केल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत आहे. अपेक्षित गतीने निर्यात वाढली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. उन्हाळ्यातील कांद्याला भाव मिळाला नव्हता. आता नवीन कांद्याचेही दरही पडले असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून, ते थांबविण्यासाठी निर्यातीमधील हस्तक्षेप थांबणे आवश्यक आहे. - अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी  

टॅग्स :onionकांदा