शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

निर्यात नाही, भाव कोसळले, कांदा आणतोय डोळ्यात पाणी

By नामदेव मोरे | Updated: March 4, 2023 09:39 IST

शेतकऱ्यांचे नुकसान : वारंवार निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कांदा निर्यातीवर शासन वारंवार निर्बंध लादत असल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होऊ लागला आहे. अस्थिर वातावरणामुळे भारतीय कांद्याची मागणी घटत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. २०१२-१३ मध्ये देशातून तब्बल १६ लाख ६६ हजार टन कांदा निर्यात झाला होता. दहा वर्षानंतर २०२१-२२ मध्ये फक्त १५ लाख ३७ हजार टन कांदा निर्यात झाला आहे. दहा वर्षांनंतरही अपेक्षित निर्यातवाढ झालेली नसल्यामुळे उत्पादन वाढल्यावर देशातील भाव कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. 

देशात कांद्याचे उत्पादन वाढले असून, बाजारभाव कोसळू लागले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नाही. शेतकरी हतबल झाला असून, कांदा फेकून द्यायची वेळ आली आहे.  चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची टीका होत आहे. 

भारतीय कांद्याला जगभर मागणीभारतीय कांद्याला जगभर मागणी आहे. परंतु जगभरातून मागणी वाढली की देशातून निर्यातबंदी होत असते. निर्यातीवर वारंवार बंधने लादली जात असल्यामुळे त्याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला आहे. यामुळे अनेक देशांनी भारतीय कांद्यावर अवलंबून न राहता इतर पर्यायांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. भारतामधून यूएई, इंडोनेशिया, कतार, कुवेत, सौदी अरब या देशांमध्ये होणारी निर्यात कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी भारतामधून १६ लाख ६६ हजार टन कांद्याची निर्यात होत होती. दहा वर्षात एक लाख २९ हजार टन निर्यात घटली आहे. शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप कमी करावा. निर्यातवाढीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप थांबविला पाहिजे. वारंवार निर्यातबंदी केल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत आहे. अपेक्षित गतीने निर्यात वाढली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. उन्हाळ्यातील कांद्याला भाव मिळाला नव्हता. आता नवीन कांद्याचेही दरही पडले असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून, ते थांबविण्यासाठी निर्यातीमधील हस्तक्षेप थांबणे आवश्यक आहे. - अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी  

टॅग्स :onionकांदा