शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता; २४० महिलांचा समावेश, कौटुंबिक वादासह अज्ञात कारणे 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 7, 2023 16:54 IST

कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत.

नवी मुंबई : कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत. तीन महिन्यात अशा ४१३ व्यक्ती बेपत्ता झाल्या असून त्यापैकी मोजक्या व्यक्तींचा शोध लागलेला आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये २४० महिलांचा समावेश आहे. 

वेगवेळ्या कारणांनी कौटुंबिक कलह वाढत आहेत. त्यातून महिलांवर मानसिक ताण येत आहे. तर नोकरी व्यवसायातील अपयशातून तसेच इतर कारणांनी तरुण, पुरुष घर सोडून जात असतात. अनेकदा घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी न आल्याने देखील ते हरवल्याची तक्रार पोलिसांकडे केली जाते. नवी मुंबईपोलिस आयुक्तालय क्षेत्रात अशा विविध कारणांनी मागील तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. त्यात काही महिला त्यांच्या लहान मुलांसह देखील बेपत्ता झाल्या आहेत. याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे प्राप्त होताच त्यांच्या शोधासाठी प्रयत्न केले जातात.

 मात्र शोध घेऊनही माहिती न मिळाल्यास पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवला जातो. प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अशा व्यक्ती नवी मुंबईसह पनवेलमधून बेपत्ता होत असतात. त्यात महिलांचे प्रमाणही गंभीर असून मागील तीन महिन्यात देखील २४० महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी काही व्यक्तींचा पोलिसांची शोध घेतला असून काही व्यक्ती काही दिवसांनी स्वतः घरची वाट धरतात. मात्र उर्वरित व्यक्ती नेमकं जातात कुठे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस