शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता; २४० महिलांचा समावेश, कौटुंबिक वादासह अज्ञात कारणे 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 7, 2023 16:54 IST

कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत.

नवी मुंबई : कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत. तीन महिन्यात अशा ४१३ व्यक्ती बेपत्ता झाल्या असून त्यापैकी मोजक्या व्यक्तींचा शोध लागलेला आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये २४० महिलांचा समावेश आहे. 

वेगवेळ्या कारणांनी कौटुंबिक कलह वाढत आहेत. त्यातून महिलांवर मानसिक ताण येत आहे. तर नोकरी व्यवसायातील अपयशातून तसेच इतर कारणांनी तरुण, पुरुष घर सोडून जात असतात. अनेकदा घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी न आल्याने देखील ते हरवल्याची तक्रार पोलिसांकडे केली जाते. नवी मुंबईपोलिस आयुक्तालय क्षेत्रात अशा विविध कारणांनी मागील तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. त्यात काही महिला त्यांच्या लहान मुलांसह देखील बेपत्ता झाल्या आहेत. याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे प्राप्त होताच त्यांच्या शोधासाठी प्रयत्न केले जातात.

 मात्र शोध घेऊनही माहिती न मिळाल्यास पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवला जातो. प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अशा व्यक्ती नवी मुंबईसह पनवेलमधून बेपत्ता होत असतात. त्यात महिलांचे प्रमाणही गंभीर असून मागील तीन महिन्यात देखील २४० महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी काही व्यक्तींचा पोलिसांची शोध घेतला असून काही व्यक्ती काही दिवसांनी स्वतः घरची वाट धरतात. मात्र उर्वरित व्यक्ती नेमकं जातात कुठे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस