शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

महामुंबईतील घातक कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार, पाताळगंगेत उभा राहतोय तीन लाख मेट्रिन टन क्षमतेचा प्रकल्प

By नारायण जाधव | Updated: January 6, 2024 19:08 IST

Navi Mumbai News: महामुंबईतील अशा ७१ टक्के धोकादायक आणि जैववैद्यकीय अशा कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याच्या संकटावर मात करण्यासाठी आता पनवेल नजीकच्या पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत वार्षिक तीन लाख मेट्रिक टन क्षमतेच्या घातक अन् जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - महामुंबईतील अशा ७१ टक्के धोकादायक आणि जैववैद्यकीय अशा कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याच्या संकटावर मात करण्यासाठी आता पनवेल नजीकच्या पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत वार्षिक तीन लाख मेट्रिक टन क्षमतेच्या घातक अन् जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प उभारण्यात येणार असला तरी महामुंबईतील शहरांपुढे असलेल्या घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यात सीमा शुल्क, डीआरआय, पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांत पकडलेले अमली पदार्थही शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले जाणार आहेत. तळोजा येथील अशा कचऱ्यावर विल्हेवाट करणारी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही खासगी क्षेत्रातील कंपनीच रसायनीतील हा प्रकल्प उभारत आहे.

३०० कोटींची गुंतवणूकपाताळगंगा एमआयडीसीतील चावणे येथप्या तीन लाख मेट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या परिवेश समितीने मान्यता दिली आहे. यानुसार कंपनी ७०.९ एकरांवर हा प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी ३०० कोटींची गुंतवणूक कंपनी करणार असून यात जमिनीच्या मूल्यासह परिसराचा विकास आणि इमारत बांधकामांचा समावेश आहे.

१२५ जणांना कायम रोजगारनव्या प्रकल्पात १२५ जणांना रोजगार मिळणार आहे. यात २० जणांना प्रशासकीय, ४५ जण कुशल कामगार आणि ६० कुशल कामगारांचा समावेश राहणार आहे.२५०० झाडे बाधित होणार कंपनीने पर्यावरण मंत्रालयास सादर केलेल्या अहवालानुसार प्रकल्पाच्या जागेत अंदाजे २५०० झाडे आहेत. जागेच्या प्राथमिक अभ्यासानंतर यापैकी १००० झाडे टिकवून ठेवण्याचा कंपनी प्रयत्न करणार असून उर्वरित १५०० झाडांवर गंडांतर येणार आहे. या बदल्यात कंपनीस तीन पट वृक्षलागवड करावी लागणार आहे.३५० केएलडी पाण्यासह १३०० केव्ही विजेची गरज प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर कंपनीस दैनंदिन ३५० किलोलिटर पाणी आणि १३०० केव्ही विजेची गरज भासणार आहे. पाणी एमआयडीसी, तर वीज महावितरण पुरविणार आहे.

महामुंबईत ७१ टक्के घातक कचऱ्यावर प्रक्रिया नाही एमएमआरडीएच्या २०१६-३६ च्या अहवालानुसार महानगर प्रदेशातील घनकचऱ्याचे जैविक विघटन होणारा कचरा, प्रक्रिया करून पुन्हा उपयोगात येणारा कचरा, ज्वलनशील कचरा आणि जड कचरा असे वर्गीकरण केले जाते. यात जैविक विघटन होणारा कचरा सर्वाधिक आहे, तर घनकचऱ्यामध्ये बांधकामातून निर्माण होणारा कचरा १९ टक्के आहे. तसेच, प्रदेशातील घातक कचऱ्यापैकी ५० टक्के घातक कचरा प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याजोगा आहे. मात्र, त्याची योग्य हाताळणी होत नाही. त्याचे गंभीर परिणाम प्रदेशातील पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होत आहेत. घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी राज्यातील पाचपैकी महापे आणि तळोजा ही दोन केंद्रे मुंबई महानगर प्रदेशात आहेत. मात्र, त्या ठिकाणी प्रदेशातील दरवर्षी गोळा होणारा एकूण ३,२५,९९४ मेट्रिक टन घातक कचऱ्यापैकी अवघ्या ९५,८९९ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असून सुमारे २,००,००६ मेट्रिक टन म्हणजेच अंदाजे ७१ टक्के घातक कचऱ्यावर प्रक्रियाच होत नाही. याशिवाय, जाळता येण्याजोग्या १,२५,२८५ मेट्रिक टन घातक कचऱ्यापैकी १२,१७६ कचऱ्यावरच प्रक्रिया होत असून १,१४,१०९ मेट्रिक टन कचरा प्रक्रियाविनाच पडून असतो, तर ई-कचऱ्यावर प्रक्रिया करणारी ४ केंद्रे असून त्या ठिकाणी १९५२० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. जैववैद्यकीय कचऱ्यावर मात्र पूर्णपणे प्रक्रिया होते. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचा पाताळगंगा येथील हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर घातक कचऱ्यावरील प्रक्रियेचा मोठा प्रश्न सुटून परिसरातील पर्यावरण, प्रदूषण राेखण्यास मदत होऊन मानवी आरोग्य सुखकर होण्यास मदत होणार आहे.- सोमनाथ मलगर, प्रमुख, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई