शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाचे मुख्यमंत्र्यांसमोर झाले अंतरिम सादरीकरण

By नारायण जाधव | Updated: February 6, 2024 16:45 IST

आज नवी मुंबईत महाराष्ट्र भवन व्हावे, या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप प्राप्त झाले

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आज नवी मुंबईत महाराष्ट्र भवन व्हावे, या  गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला  खऱ्या अर्थाने मुहर्तस्वरूप प्राप्त झाले आहे. सोमवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठकीत नवी मुंबईमधील वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे  भव्यदिव्य वास्तूचे अंतरीम सादरीकरण करण्यात आले, अशी माहिती यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.

महाराष्ट्र भवनाची वास्तू कशी असेल ते मी आज प्रत्यक्ष पाहून माझ्या जीवनातला आनंद मावेनासा झाला आहे. महाराष्ट्र भवनाची वास्तू 14 मजली असून त्याचबरोबर अशा या सुंदर महाराष्ट्र भवनामध्ये अभ्यागतांसाठी स्वागत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, भोजन कक्ष, प्रीफेशनल एरीया, बंक्वेट हॉल, सूट रूम, ज्यूस कॅफ, टी- कॅफ, कॉफी-कॅफ, बैठक कक्ष, ई-लायब्री, कॉनफरंन्स हॉल, फूड प्लाझा विश्रांती कक्ष, व्ही.आय.पी. रूम तसेच लोकप्रतिनिधीं सोबत येणारे त्यांचे सारथी, सहकारी, वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही विश्रांती रूम असणार आहेत. त्याचबरोबर अशा अनेक विविध प्रकारच्या सुसज्ज सुख-सुविधांची रेलचेल या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत. तसेच महाराष्ट्र भवनाचे प्रथम दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे अशी प्रथमच वास्तू महाराष्ट्रामध्ये उभी राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी वर्ग यांचे  म्हात्रे यांनी आभार मानले. नवी मुंबई शहर वसवितांना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र जागा नसल्याने व हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या महाराष्ट्र भवनासाठी सन 2014 पासून माझा जो लढा चालला होता त्याला आज पूर्णपणे पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई