शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

घुसखोर, स्थानबद्ध विदेशींचा सांभाळ करण्याची कटकट होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 06:36 IST

मुंबई, नवी मुंबईत होणार स्थानबद्धता केंद्र, ५७ कोटींचा खर्च

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : व्हिसाची मुदत संपुष्टात येऊनही, तसेच विविध गुन्ह्यांत कारागृहातून मुक्त झालेल्या विदेशी नागरिकांना आता नवी मुंबईत  येथे कायमस्वरूपी, तर मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात तात्पुरते स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

सद्य:स्थितीत राज्यात असे केंद्र उपलब्ध नसल्याने स्थानबद्ध करण्यात येणाऱ्या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात अडचणी निर्माण होत आहेत, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होत आहे. सद्य:स्थितीत राज्यात कोठेही अशा परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी सुयाेग्य सोय वा केेंद्र नाही. यामुळे विविध प्रकारांतील परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करताना अनेक अडचणी निर्माण होऊन त्या त्या देशांशी असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर विपरीत  परिणाम होतो. यामुळे देशाच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची भीती असते.

सामाजिक न्याय विभागाकडे संचालनमुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणच्या स्थानबद्धता केंद्रांचे संचालन सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी २६९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यात तात्पुरत्या केंद्रासाठी ६५ कर्मचाऱ्यांकरिता २.६४ कोटी, तर कायमस्वरूपी केंद्रासाठीच्या २०४ कर्मचाऱ्यांसाठी ८.४४ कोटींच्या खर्चासही मंजुरी दिली आहे.

मुंबईत ८०, नवी मुंबईत २१३ विदेशींची सोयविदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन उशिरा का होईना, आता मुंबईच्या भोईवाडा मध्यवर्ती  कारागृहात ८० विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील, तर राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक ११, बाळेगाव, नवी मुंबई येथे २१३ विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी कायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्र सुरू करण्यास गृहविभागाने मान्यता दिली आहे.

कायमस्वरूपी केंद्राची इमारत ४६ कोटींचीकायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्राच्या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडून करावयाचे असून, त्यासाठी ४६ कोटी खर्च येणार आहे.

कोणत्या विदेशी नागरिकांना करणार स्थानबद्धव्हिसा मुदत संपुष्टात आलेले विदेशी नागरिक, कारागृहातूून शिक्षा भोगून मुक्त झालेले विदेशी नागरिक, तसेच विविध कारणांस्तव  मायदेशी परत न गेलेल्या विदेशी नागविकांसह पारपत्राविना देशात घुसखोर केलेल्या विदेशींना स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

विदेशींचा सांभाळ करताना येणाऱ्या अडचणीजगातील प्रत्येक देशाची भाषा, धर्म, रीतिरिवाज, पोशाख, अन्न वेगवेगळे आहे. यामुळे विदेशींना अटक केल्यावर किंवा त्यांना काही  कारणास्तव स्थानबद्ध करायचे झाल्यास सर्वांत आधी अडचण येते ती भाषेची. शिवाय धार्मिक रीतिरिवाज, पोशाख, अन्नधान्य पुरविताना मोठ्या अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्या-त्या देशांच्या दूतावासाशी संपर्क साधून या स्थानबद्ध केलेल्या विदेशी  नागरिकांशी संपर्क सोडविणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, तसेच त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविणे या स्थानबद्धता केंद्रामुळे सोपे होणार आहे. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासही मदत होणार आहे.

टॅग्स :jailतुरुंग