शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला मिळणार गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:11 IST

शासनाने स्थापन केली समिती : इतिहास अभ्यासकांचा समावेश

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने राज्यस्तरीय समितीसह पाच विभागीय समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांवर इतिहास अभ्यासकांसह गडसंवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. सर्व किल्ल्यांचा संवर्धनविषयक आराखडा तयार करण्यापासून प्रत्यक्ष संवर्धनासाठीचे अहवाल व जनजागृतीचे काम ही समिती करणार आहे. 

गड, किल्ले हे राज्यांचे ऐतिहासिक वैभव आहे. परंतु, अनेक किल्ल्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या किल्ल्यांनाही  समस्यांचा विळखा आहे. अनेक सामाजिक संस्थांनी किल्ल्यांवर  संवर्धनाचे काम सुरू केले आहे, परंतु, या प्रयत्नांना शासनाकडून पाठबळ मिळत नव्हते. शासनाने यापूर्वी संवर्धन समित्या स्थापन केल्या होत्या. परंतु, जानेवारी २०२० मध्ये या समित्यांवरील सदस्यांच्या नेमणुका रद्द केल्या होत्या. नवीन समिती स्थापन करण्याची मागणी दुर्गप्रेमींकडून केली जात होती. तिची दखल घेऊन ३० नाेव्हेंबरला  ३६ सदस्यांची नवीन समिती स्थापन केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. राज्यस्तरीय समितीवर १४ सदस्य असणार आहेत. कोकण, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद, नांदेड विभागासाठी पाच विभागीय समित्या स्थापन केल्या असून, त्यावर ४ ते ५ सदस्यांची नियुक्ती केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे दुर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. राज्य व विभागीय समित्यांमुळे दुर्गसंवर्धनाच्या कामाला गती येईल, असे मत व्यक्त केले आहे. 

गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी समिती स्थापन केल्याबद्दल शासनाचे आभार. या समितीमुळे गड, संवर्धनाच्या कामाला गती येईल. पुणे विभागीय समितीवर नियुक्ती केली असून, संवर्धनासाठी सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न केला जाईल. - संतोष हसूूरकर, संस्थापक दुर्गवीर प्रतिष्ठान

राज्यस्तरीय समितीची भूमिका

n विभागस्तरीय समितीच्या शिफारशीप्रमाणे राज्यातील असंरक्षित गड, किल्ल्यांची जिल्हानिहाय माहिती तयार करणे. n गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोणकोणते जनजागृतीपण उपक्रम राबविता येतील, त्याचा आराखडा तयार करणे. n संवर्धनासाठी स्थानिक नागरिक, संस्था, विद्यार्थी, युवक, बचत गट यांना सहभागी करण्याचा आराखडा तयार करणे.n दुर्गसंवर्धनासाठी दत्तक योजना तयार करणे व गडावरील नियमित स्वच्छता मोहिमांसाठीचा आराखडा तयार करणे. n गड किल्ल्यांवर संस्था व उद्योगांच्या मदतीने नकाशे, माहितीफलक लावण्याचा आराखडा तयार करणे.

विभागीय समितीची जबाबदारी 

n विभागातील गडकिल्ल्यांची सर्वंकश माहिती गोळा करणे, जिल्हानिहाय किल्ले, गॅझेटिअर्स तयार करण्यासाठी मदत करणे. n किल्लानिहाय दुरुस्तीची शासनाला शिफारस करणे.n गडसंवर्धन करताना किल्ल्याचे पावित्र्य राखून पुरातत्वीय नियमानुसार कोणत्या सुविधा देता येतील याविषयी शिफारस करणे. n पर्यटन विकासासाठीचा  व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचा आराखडा तयार करणे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFortगडEknath Shindeएकनाथ शिंदे