शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शेती मरण पंथाला ?

By admin | Updated: November 25, 2015 01:40 IST

कोकणच्या काही समस्या या मुळातच गहन आहेत. विशेषत: ग्रामीण कोकणच्या ज्या समस्या आहेत त्या कुणी जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केलाच नाही.

उमेश जाधव, टिटवाळाकोकणच्या काही समस्या या मुळातच गहन आहेत. विशेषत: ग्रामीण कोकणच्या ज्या समस्या आहेत त्या कुणी जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केलाच नाही. त्याचा परिणाम कोकणच्या ग्रामीण भागातील शेतीवर होत असल्याने सध्याच्या परिस्थितीत शेती ही संपुष्टात येत चालली आहे. अर्धी अधिक गावे आजमितीला ओस पडलेली दिसत आहे. काही गावांत तर 80 टक्क्यापेक्षा अधिक शेती ओसाड पडली असल्याचे चित्र पहावयास मिळते. याच्यावर शासनाने काही उपाययोजना केली नाही तर गावेच्या गावे ओसाड शेतीत रूपांतर होतील. याचे अनिष्ट परिणाम ग्रामीण कोकणावर तर होतीलच पण याचे पडसाद कोकणस्थीत महाराष्ट्राची राजधानी मुंबई व लगतच्या उपनगरावर उमटल्याशिवाय रहाणार नाहीत. भौगोलिकदृष्ट्या कोकणचे तळ कोकण यात रत्नागिरी , सिंधुदुर्ग व रायगडचा काही भाग येतो. तर उर्वरीत कोकणात ठाणे , पालघर व रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग (मळ कोकण) येतो. याशिवायही मुंबई व तिची उपनगरे हा विकसित असा शहरी पट्टा देखील समाविष्ट होतो. तर सह्याद्री पर्वत रांगेला लागून असलेल्या (उत्तर-दक्षिण) पट्ट्याला पूर्णपणे आदिवासी भाग म्हणता येईल.या प्रत्येक पट्ट्यात राहणारा समाज, त्यांचा व्यवसाय हा भिन्न भिन्न आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या ही वेगवेगळ्या आहेत. या कारणास्तव कोकणच्या समस्यांचे निराकरण करतांना हे विविध सामाजिक, आर्थिक व भौगोलिक वेगळेपण विचारात घेणे गरजेचे आहे. आज सह्याद्री डोंगर रांगेलगत वसलेला आदिवासी तसेच मध्ये कोकण पट्ट्यात वसलेला ओबीसी समाज यांच्या समस्यांची भीषणता तातडीने जाणून घ्यायला हवी. अन्यथा येथील शेतकरी जर का विदर्भातील शेतकरी वर्गाच्या आत्महत्या करण्याच्या मार्गावर चालला तर मात्र याचा सर्व दोष शासन व राज्यकर्त्यांना लागल्या खेरीज रहाणार नाही. या कारणास्तव सध्या एक प्रश्न उपस्थितीत होत आहे, की हे होण्याची आपण वाट पहायची का? गाव, खेड्या- पाड्यातील भात शेती आज ओस पडत चालली आहे. तरूण वर्गाचा शहरातील रोजगाराच्या निमित्ताने शहराकडे वाढता कल दिसत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा शहरी भागात स्थलांतर वाढले आहे. ४० ते ६० या वयोगटातील वर्गच फक्त शेती करणारा शेवटचा वर्ग आहे. या ठिकाणी भात हे मुख्य पिक घेतले जाते. गेली वीस-पंचवीस वर्षांत भातपिकाच्या बाजार भावात फारसा बदल झाला असल्याचे दिसत नाही. मात्र तूरडाळी सकट इतर शेतमालाला चौपट बाजार भाव लाभला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी तीस रूपये रोजाने मजूर मिळत असे, परंतु आता तोच मजूर तीनशे रूपये मजुरीवर येऊन पोहोचलाय. या वरून कोकणच्या शेतकरी वर्गाची तुलना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यां बरोबर करताच येणार नाही. भात बियाणे, खते, मजूर व औजारे यांचे वाढलेले दर यामुळे कोकणचा बळीराजा शेती कसणार तरी कशी ? हा ही एक यक्ष प्रश्नच आहे. बँका कर्ज देण्यास तयार आहेत पण ही कर्जे फेडायची कशी? सेवा सोसायट्यां कडून घेतलेल्या कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या येथे आर्थिक संकटाची नांदी येऊ घातली आहे. याला जबाबदार कोण असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक लोकप्रनिधींची उदासीनता की त्यांना येणाऱ्या यांनी संकटाची भीषणताच कळली नसावी की काय असा ही सवाल उपस्थित होत आहे. यामुळे सध्या परप्रांतीय व धनदांडग्या धनवानांना जमिनी विकण्याचा सपाटा शेतकरी वर्गाने उचलला आहे. शेतजमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराला सध्या उत आला आहे. थोडीशी जरी शेती विकली तरी लाखो रूपये मिळतात. त्याच जागेत गेली कित्येक वर्षा पासून शेती करून तेवढे पैसे राबराब राबून कमावता आले नाही ते एका गुंठ्यात मिळतात. याच कारणास्तव येथील शेतकऱ्याचा जमिन विक्रीकडे कल वाढला आहे परंतु यात शेतकरी धनवान होण्या ऐवजी यातील दलाल धनवान होत चाललाय. हे थांबवायचे असेल तर कल्याण , बदलापूर, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर या तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास, काळू व भातसा तसेच इतर कोकण किनारपट्टी लगतच्या नद्यांचे पाणी येथील भात व इतर शेतीला हरित करण्यासाठी कसा देता येईल यावर शासनाने उपाययोजना केली पाहिजे. तरच कोकणातील भातशेती वाचेल.