शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

दहा हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 23:08 IST

अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. त्यांच्याकडून दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. त्या माध्यमातून जवळपास ३३ कोटींचा अपहार झाला असून, अनेकांना अटकही करण्यात आली आहे.झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी अनेकांकडून सोयीचे मार्ग निवडले जात आहेत. याचा फायदा घेऊन मल्टिलेवल मार्केटिंगच्या कंपन्यांनी सर्वत्र त्यांचे जाळे पसरवले आहे. त्यांनी नेमलेल्या एजंटकडून अधिक नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीला भाग पाडले जात आहे. त्यानुसार अनेक जण अशा कंपन्यांमध्ये पाच ते दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जात आहे. तर गुंतवणूकदारांचा आकडा वाढवण्यासाठी कंपन्यांकडून सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफाही मिळवून दिला जातो. मात्र, गुंतवणूकदार वाढल्यानंतर जमा झालेले कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचालकांकडून पोबारा केला जात आहे. मुळात आरबीआयच्या नियमावलीनुसारच गुंतवणूक करून घेणे व नफा देणे बंधनकारक आहे. त्यानंतरही केवळ फसवणुकीच्या उद्देशाने कंपन्यांची स्थापना करून आरबीआयच्या नियमांची पायमल्ली करून पैशाची गुंतवणूक करून घेणाºया कंपन्या चालवल्या जात आहेत. अशा कंपन्यांकडून नवी मुंबईत मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार त्यांची ३३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये राईस पुलर, शक्ती मल्टिपर्पज सोसायटी, एम. पिक्चर्स व कॅपिटल क्लब अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल असून या कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींसह दलालांनाही अटक करण्यात आलेली आहे.भाड्याची कार्यालये घेऊन आलिशान कार्यालय थाटल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना भुरळ घालणारे सेमिनार घेतले जातात. त्यामध्ये थोड्या फार रकमेच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याची फसवी आमिषे दाखवली जातात. त्याशिवाय सोन्याचे सिक्के, कार व इतर वस्तू भेट स्वरूपात देण्याचेही आमिष दाखवले जाते. हे पाहून सर्वसामान्य व्यक्तीचे डोळे दीपत असल्याने, त्यांच्याकडून झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी लाखो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. अशा कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांकडे धाव घेतली जाते. मात्र, तोपर्यंत संबंधितांनी जमा रकमेचा अपहार करून पळ काढलेला असतो. यामुळे अनेकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांनाही अपयश येत आहे.मार्केटिंग कंपन्यांपाठोपाठ आभासी चलनाद्वारे गुंतवणूक करून घेणाºयाही कंपन्या शहरात धुमाकूळ घालत आहेत. अशा काही कंपन्यांच्या दलालांनाही यापूर्वी पोलिसांनी अटक केलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या कंपन्यांचा संपूर्ण व्यवहार व प्रचार होत आहे. तर हे जाळे चालवणाºया व्यक्ती परराज्यातून सूत्रे हाताळत असतात, यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.>पोलिसांच्या आवाहनाकडेही दुर्लक्षजादा नफ्याचे आमिष दाखवणाºया तसेच इतर बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचे आवाहन पोलिसांकडून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. त्यानंतरही दलालांकडून दिली जाणारी हमी व अधिक नफ्याचे आश्वासन याला अनेक जण बळी पडत आहेत. त्यामुळे मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अनेकांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची ३३ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे.>झटपट श्रीमंतीचा मोह पडतोय महागातसध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेकांकडून एक दुसऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीशीही स्पर्धा केली जात आहे. त्यामुळे इतरांप्रमाणेच आपणही श्रीमंत व्हावे, या उद्देशाने कमी कालावधीत जादा नफा देणाºया कंपन्यांमधून गुंतवणूक करण्यावर भर दिला जात आहे; परंतु अशा कंपन्यांच्या व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नसल्याने ठरावीक कालावधीनंतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.>नागरिकांनी कष्टाचा पैसा गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत मार्गाचाच वापर केला पाहिजे; परंतु फसव्या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडून अनेक जण वेगवेगळ्या बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली जाते. त्यानुसार अनेक कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाईही केलेली आहे; परंतु नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच पैशाची गुंतवणूक केली पाहिजे.- प्रवीणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.