शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

दहा हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 23:08 IST

अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. त्यांच्याकडून दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. त्या माध्यमातून जवळपास ३३ कोटींचा अपहार झाला असून, अनेकांना अटकही करण्यात आली आहे.झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी अनेकांकडून सोयीचे मार्ग निवडले जात आहेत. याचा फायदा घेऊन मल्टिलेवल मार्केटिंगच्या कंपन्यांनी सर्वत्र त्यांचे जाळे पसरवले आहे. त्यांनी नेमलेल्या एजंटकडून अधिक नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीला भाग पाडले जात आहे. त्यानुसार अनेक जण अशा कंपन्यांमध्ये पाच ते दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जात आहे. तर गुंतवणूकदारांचा आकडा वाढवण्यासाठी कंपन्यांकडून सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफाही मिळवून दिला जातो. मात्र, गुंतवणूकदार वाढल्यानंतर जमा झालेले कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचालकांकडून पोबारा केला जात आहे. मुळात आरबीआयच्या नियमावलीनुसारच गुंतवणूक करून घेणे व नफा देणे बंधनकारक आहे. त्यानंतरही केवळ फसवणुकीच्या उद्देशाने कंपन्यांची स्थापना करून आरबीआयच्या नियमांची पायमल्ली करून पैशाची गुंतवणूक करून घेणाºया कंपन्या चालवल्या जात आहेत. अशा कंपन्यांकडून नवी मुंबईत मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार त्यांची ३३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये राईस पुलर, शक्ती मल्टिपर्पज सोसायटी, एम. पिक्चर्स व कॅपिटल क्लब अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल असून या कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींसह दलालांनाही अटक करण्यात आलेली आहे.भाड्याची कार्यालये घेऊन आलिशान कार्यालय थाटल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना भुरळ घालणारे सेमिनार घेतले जातात. त्यामध्ये थोड्या फार रकमेच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याची फसवी आमिषे दाखवली जातात. त्याशिवाय सोन्याचे सिक्के, कार व इतर वस्तू भेट स्वरूपात देण्याचेही आमिष दाखवले जाते. हे पाहून सर्वसामान्य व्यक्तीचे डोळे दीपत असल्याने, त्यांच्याकडून झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी लाखो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. अशा कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांकडे धाव घेतली जाते. मात्र, तोपर्यंत संबंधितांनी जमा रकमेचा अपहार करून पळ काढलेला असतो. यामुळे अनेकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांनाही अपयश येत आहे.मार्केटिंग कंपन्यांपाठोपाठ आभासी चलनाद्वारे गुंतवणूक करून घेणाºयाही कंपन्या शहरात धुमाकूळ घालत आहेत. अशा काही कंपन्यांच्या दलालांनाही यापूर्वी पोलिसांनी अटक केलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या कंपन्यांचा संपूर्ण व्यवहार व प्रचार होत आहे. तर हे जाळे चालवणाºया व्यक्ती परराज्यातून सूत्रे हाताळत असतात, यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.>पोलिसांच्या आवाहनाकडेही दुर्लक्षजादा नफ्याचे आमिष दाखवणाºया तसेच इतर बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचे आवाहन पोलिसांकडून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. त्यानंतरही दलालांकडून दिली जाणारी हमी व अधिक नफ्याचे आश्वासन याला अनेक जण बळी पडत आहेत. त्यामुळे मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अनेकांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची ३३ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे.>झटपट श्रीमंतीचा मोह पडतोय महागातसध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेकांकडून एक दुसऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीशीही स्पर्धा केली जात आहे. त्यामुळे इतरांप्रमाणेच आपणही श्रीमंत व्हावे, या उद्देशाने कमी कालावधीत जादा नफा देणाºया कंपन्यांमधून गुंतवणूक करण्यावर भर दिला जात आहे; परंतु अशा कंपन्यांच्या व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नसल्याने ठरावीक कालावधीनंतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.>नागरिकांनी कष्टाचा पैसा गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत मार्गाचाच वापर केला पाहिजे; परंतु फसव्या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडून अनेक जण वेगवेगळ्या बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली जाते. त्यानुसार अनेक कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाईही केलेली आहे; परंतु नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच पैशाची गुंतवणूक केली पाहिजे.- प्रवीणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.