शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 23:08 IST

अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. त्यांच्याकडून दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. त्या माध्यमातून जवळपास ३३ कोटींचा अपहार झाला असून, अनेकांना अटकही करण्यात आली आहे.झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी अनेकांकडून सोयीचे मार्ग निवडले जात आहेत. याचा फायदा घेऊन मल्टिलेवल मार्केटिंगच्या कंपन्यांनी सर्वत्र त्यांचे जाळे पसरवले आहे. त्यांनी नेमलेल्या एजंटकडून अधिक नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीला भाग पाडले जात आहे. त्यानुसार अनेक जण अशा कंपन्यांमध्ये पाच ते दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जात आहे. तर गुंतवणूकदारांचा आकडा वाढवण्यासाठी कंपन्यांकडून सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफाही मिळवून दिला जातो. मात्र, गुंतवणूकदार वाढल्यानंतर जमा झालेले कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचालकांकडून पोबारा केला जात आहे. मुळात आरबीआयच्या नियमावलीनुसारच गुंतवणूक करून घेणे व नफा देणे बंधनकारक आहे. त्यानंतरही केवळ फसवणुकीच्या उद्देशाने कंपन्यांची स्थापना करून आरबीआयच्या नियमांची पायमल्ली करून पैशाची गुंतवणूक करून घेणाºया कंपन्या चालवल्या जात आहेत. अशा कंपन्यांकडून नवी मुंबईत मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार त्यांची ३३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये राईस पुलर, शक्ती मल्टिपर्पज सोसायटी, एम. पिक्चर्स व कॅपिटल क्लब अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल असून या कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींसह दलालांनाही अटक करण्यात आलेली आहे.भाड्याची कार्यालये घेऊन आलिशान कार्यालय थाटल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना भुरळ घालणारे सेमिनार घेतले जातात. त्यामध्ये थोड्या फार रकमेच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याची फसवी आमिषे दाखवली जातात. त्याशिवाय सोन्याचे सिक्के, कार व इतर वस्तू भेट स्वरूपात देण्याचेही आमिष दाखवले जाते. हे पाहून सर्वसामान्य व्यक्तीचे डोळे दीपत असल्याने, त्यांच्याकडून झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी लाखो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. अशा कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांकडे धाव घेतली जाते. मात्र, तोपर्यंत संबंधितांनी जमा रकमेचा अपहार करून पळ काढलेला असतो. यामुळे अनेकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांनाही अपयश येत आहे.मार्केटिंग कंपन्यांपाठोपाठ आभासी चलनाद्वारे गुंतवणूक करून घेणाºयाही कंपन्या शहरात धुमाकूळ घालत आहेत. अशा काही कंपन्यांच्या दलालांनाही यापूर्वी पोलिसांनी अटक केलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या कंपन्यांचा संपूर्ण व्यवहार व प्रचार होत आहे. तर हे जाळे चालवणाºया व्यक्ती परराज्यातून सूत्रे हाताळत असतात, यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.>पोलिसांच्या आवाहनाकडेही दुर्लक्षजादा नफ्याचे आमिष दाखवणाºया तसेच इतर बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचे आवाहन पोलिसांकडून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. त्यानंतरही दलालांकडून दिली जाणारी हमी व अधिक नफ्याचे आश्वासन याला अनेक जण बळी पडत आहेत. त्यामुळे मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अनेकांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची ३३ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे.>झटपट श्रीमंतीचा मोह पडतोय महागातसध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेकांकडून एक दुसऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीशीही स्पर्धा केली जात आहे. त्यामुळे इतरांप्रमाणेच आपणही श्रीमंत व्हावे, या उद्देशाने कमी कालावधीत जादा नफा देणाºया कंपन्यांमधून गुंतवणूक करण्यावर भर दिला जात आहे; परंतु अशा कंपन्यांच्या व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नसल्याने ठरावीक कालावधीनंतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.>नागरिकांनी कष्टाचा पैसा गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत मार्गाचाच वापर केला पाहिजे; परंतु फसव्या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडून अनेक जण वेगवेगळ्या बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली जाते. त्यानुसार अनेक कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाईही केलेली आहे; परंतु नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच पैशाची गुंतवणूक केली पाहिजे.- प्रवीणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.