शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बावखळेश्वर मंदिर आज जमीनदोस्त होणार, जमावबंदी आदेश जारी, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 05:11 IST

एमआयडीसीमधील बावखळेश्वरसह तिन्ही मंदिरांवर एमआयडीसी गुरुवारी कारवाई करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून येथील १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : एमआयडीसीमधील बावखळेश्वरसह तिन्ही मंदिरांवर एमआयडीसी गुरुवारी कारवाई करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून येथील १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. या दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परिसरामध्ये जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.औद्योगिक वसाहतीच्या जागेवर अतिक्रमण करून बावखळेश्वर, गणेश व महाकाली मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. याशिवाय परिसरामध्ये तलावाचे सुशोभीकरण, नारळाची बाग व कार्यालय उभारण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी २०१३मध्ये याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जुलै २०१३मध्ये उच्च न्यायालयाने बावखळेश्वर मंदिरासह सीबीडी बेलापूरमधील ग्लास हाउस परिसर अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मंदिर अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कारवाई न केल्यामुळे प्रशासनाला धारेवर धरले होते. याप्रकरणी कारवाई केली नाही तर अधिकाºयांवरच कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यामुळे एमआयडीसी प्रशासनाने कारवाईसाठी पोलिसांकडे बंदोबस्त मागितला होता. १३ व १४ डिसेंबरला पोलिसांनी बंदोबस्त दिला असून या परिसरामध्ये जमाबंदी आदेश जारी केला आहे. सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील यांनी १फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४प्रमाणे हा आदेश जारी केला आहे. नवी मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ टीटीसी मधील पावणे भागात भूखंड क्रमांक १२ या भूखंडावर बावखळेश्वर मंदिर पक्क्या स्वरूपात बांधले आहे. मंदिराचे विश्वस्त सतीश पाटील व संतोष तांडेल यांनी एमआयडीसी कार्यालयास दिलेल्या पत्रावरून त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली नाही. एमआयडीसीच्या रजिस्ट्री अस्तित्वात असल्याबाबत एमआयडीसीकडे किंवा पोलीस ठाण्याकडे कोणतीही नोंद नाही. सदरच्या ठिकाणी एकूण तीन मंदिरे असून ते २००९मध्ये बांधण्यात आली आहेत. ही मंदिरे पुरातन नाहीत. एमआयडीसीची १००३५ चौरस मीटर क्षेत्रफळावर तीन मंदिरे आहेत. मंदिराला लागून एकूण १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणांविरोधात जुलै २०१३मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती. चार वर्षांपासून मंदिरावर कारवाई होणार की नाही, याविषयी तर्क-वितर्क लढविले जात होते. अखेर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला असून परिसरामध्ये प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कारवाईकडेशहरवासीयांचे लक्षबावखळेश्वर मंदिर व परिसरातील बांधकामावर होणाºया कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या परिसराला राजकीयदृष्ट्याही महत्त्व असल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांचेही याकडे लक्ष लागले आहे. एमआयडीसी प्रशासन काय कारवाई करते. मंदिर वाचविण्यासाठी आंदोलन केले जाणार का? या सर्वांविषयी शहरभर चर्चा सुरू झाली आहे.पोलिसांनी जारी केलेला मनाई आदेश- बावळखेश्वर मंदिर परिसराच्या १०० मीटर परिसरामध्ये१३ व १४ डिसेंबर रोजी मनाई आदेश जारी करण्यात येत आहे- मंदिर परिसरामध्ये दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे बरोबर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.- या परिसरामध्ये कोणालाही स्फोटक किंवा दाहक वस्तू घेऊन जाता येणार नाही.- भाले, तलवारी, काठ्या, बंदुका, देशी कट्टे, रिव्हाल्वर व इतर कोणतीही शस्त्रे सोबत घेऊन जाता येणार नाही.- कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाºयाच्या चित्राचे किंवा प्रतिमांचे दहन करता येणार नाही.- मंदिर परिसरामध्ये कोणालाही मोठ्या आवाजात किंवा अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करता येणार नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई