शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

सलग १५व्या वर्षी नवी मुंबईकरांना कर दिलासा; कोणतीही दरवाढ नाही

By योगेश पिंगळे | Updated: February 20, 2024 18:52 IST

कोणतीही करवाढ नाही : ४,९५० कोटींचा अर्थसंकल्प सादर

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : सलग १५व्या वर्षी नवी मुंबईकरांना कोणतीही करवाढ नसलेला २०२४-२५चा ४ हजार ९५० कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी सादर केला. करवाढ नसल्याने नवी मुंबईकरांना यंदाही मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षणास प्राधान्यक्रम देतानाच स्वच्छता, पर्यावरण, वाहतूक सुविधा, लोककल्याणकारी योजनांवर भर दिला असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. सलग १५ वर्षे सातत्याने नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही.

महापालिका आयुक्तांनी २०२४-२५ मध्ये १३७७.६८ कोटी आरंभीच्या शिल्लकेस २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ४,९५० कोटी रुपये जमा, तर ४९४७.३० कोटी रुपये खर्चासह २ कोटी ७० लाख रुपये शिलकीचा नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेची आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासह महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण गुणवत्ता विकास, अग्निशमन विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विदेशी बनावटीच्या वाहनांची खरेदी, दिव्यांगांचे सक्षमीकरण, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय घटक, आर्थिक दुर्बल घटक यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यावर भर दिला असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

कोपरखैरणे येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधणे, परिवहन बसस्थानकांचा विकास करणे, घणसोली - ऐरोली खाडीपूल व रस्ता बांधणे, पार्किंग, विद्युत मलनिःसारणविषयक कामे करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.वाहतूक सुधारणार : वाहतूककोंडी टाळण्यासाठी पामबीच मार्गावर वाशी सेक्टर १७ येथे २९० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. शहरातील चार ठिकाणच्या कल्व्हर्ट पुनर्बांधणी, दुरुस्ती आणि सुधारणा करण्यात येणार आहेत. महापे उड्डाणपुलावरून ठाणे बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आर्म बांधण्यात येणार आहे. तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी ठाणे - बेलापूर रस्त्यावरून सायन - पनवेल ब्रिजवर आर्म उभारण्यात येणार आहे.

नवीन जलस्रोत : नवी मुंबईतील लोकसंख्या वाढीचा दर विचारात घेऊन सन २०५५ पर्यंत या शहराला सुमारे ९५० द. ल. लि. दैनंदिन पाण्याची आवश्यकता लागणार आहे. याकरिता शहरासाठी भीरा जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मितीनंतर विसर्ग केलेले पाणी घेणे, पावसाळा कालावधीत पाताळगंगा नदीतील पाणी उचलणे, भीरा धरणातून कुंडलिका नदीचे टेलरेस पाणी मिळविणे, अशा जलस्रोतांबाबतच्या विविध पर्यायांचा विचार केला असून, शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.

कचरा वाहतुकीचे आधुनिकीकरण : नव्याने काढण्यात येणाऱ्या कचरा वाहतुकीच्या निविदेमध्ये सद्यस्थितीत असलेल्या वाहनांव्यतिरिक्त नवीन १०० वाहनांची वाढ नियोजित असून, त्यामधील ४० वाहने बॅटरी ऑपरेटेड असतील.

संगीत शिक्षण : विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रायोगिकतत्त्वावर आधुनिक सुविधांसह संगीत, वादन, गायन शिकविण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

सौरउर्जा व जलविद्युत प्रकल्प : मोरबे धरणावर १०० मेगावॅट क्षमतेचा व १.५ मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, या प्रकल्पाला फेरमान्यता घेण्यात आली आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या वीजबिलात ५० कोटी रुपयांची बचत होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका