शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

सलग १५व्या वर्षी नवी मुंबईकरांना कर दिलासा; कोणतीही दरवाढ नाही

By योगेश पिंगळे | Updated: February 20, 2024 18:52 IST

कोणतीही करवाढ नाही : ४,९५० कोटींचा अर्थसंकल्प सादर

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : सलग १५व्या वर्षी नवी मुंबईकरांना कोणतीही करवाढ नसलेला २०२४-२५चा ४ हजार ९५० कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी सादर केला. करवाढ नसल्याने नवी मुंबईकरांना यंदाही मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षणास प्राधान्यक्रम देतानाच स्वच्छता, पर्यावरण, वाहतूक सुविधा, लोककल्याणकारी योजनांवर भर दिला असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. सलग १५ वर्षे सातत्याने नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही.

महापालिका आयुक्तांनी २०२४-२५ मध्ये १३७७.६८ कोटी आरंभीच्या शिल्लकेस २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ४,९५० कोटी रुपये जमा, तर ४९४७.३० कोटी रुपये खर्चासह २ कोटी ७० लाख रुपये शिलकीचा नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेची आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासह महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण गुणवत्ता विकास, अग्निशमन विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विदेशी बनावटीच्या वाहनांची खरेदी, दिव्यांगांचे सक्षमीकरण, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय घटक, आर्थिक दुर्बल घटक यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यावर भर दिला असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

कोपरखैरणे येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधणे, परिवहन बसस्थानकांचा विकास करणे, घणसोली - ऐरोली खाडीपूल व रस्ता बांधणे, पार्किंग, विद्युत मलनिःसारणविषयक कामे करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.वाहतूक सुधारणार : वाहतूककोंडी टाळण्यासाठी पामबीच मार्गावर वाशी सेक्टर १७ येथे २९० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. शहरातील चार ठिकाणच्या कल्व्हर्ट पुनर्बांधणी, दुरुस्ती आणि सुधारणा करण्यात येणार आहेत. महापे उड्डाणपुलावरून ठाणे बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आर्म बांधण्यात येणार आहे. तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी ठाणे - बेलापूर रस्त्यावरून सायन - पनवेल ब्रिजवर आर्म उभारण्यात येणार आहे.

नवीन जलस्रोत : नवी मुंबईतील लोकसंख्या वाढीचा दर विचारात घेऊन सन २०५५ पर्यंत या शहराला सुमारे ९५० द. ल. लि. दैनंदिन पाण्याची आवश्यकता लागणार आहे. याकरिता शहरासाठी भीरा जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मितीनंतर विसर्ग केलेले पाणी घेणे, पावसाळा कालावधीत पाताळगंगा नदीतील पाणी उचलणे, भीरा धरणातून कुंडलिका नदीचे टेलरेस पाणी मिळविणे, अशा जलस्रोतांबाबतच्या विविध पर्यायांचा विचार केला असून, शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.

कचरा वाहतुकीचे आधुनिकीकरण : नव्याने काढण्यात येणाऱ्या कचरा वाहतुकीच्या निविदेमध्ये सद्यस्थितीत असलेल्या वाहनांव्यतिरिक्त नवीन १०० वाहनांची वाढ नियोजित असून, त्यामधील ४० वाहने बॅटरी ऑपरेटेड असतील.

संगीत शिक्षण : विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रायोगिकतत्त्वावर आधुनिक सुविधांसह संगीत, वादन, गायन शिकविण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

सौरउर्जा व जलविद्युत प्रकल्प : मोरबे धरणावर १०० मेगावॅट क्षमतेचा व १.५ मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, या प्रकल्पाला फेरमान्यता घेण्यात आली आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या वीजबिलात ५० कोटी रुपयांची बचत होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका