शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

करमाफीचा प्रस्ताव निव्वळ राजकीय - मंदा म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:44 IST

मागील अनेक वर्षांपासून महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

नवी मुंबई : महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा ठराव मंजुरीसाठी आणला जाणार आहे. परंतु केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने हा प्रस्ताव आणल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. त्यामुळे करमाफीच्या या प्रस्तावावरून येत्या काळात राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षांपासून महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सत्तेवर येताना पुढील वीस वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ न करण्याची घोषणा नाईक यांनी केली होती. त्यानुसार मागील अठरा वर्षात मालमत्ता कर आणि पाणी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आता त्याही पुढे जात ५00 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करातून शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केला आहे. त्यासाठी महापालिकेच्या आगामी सभेत ठरावही मांडला जाणार आहे. या प्रस्तावित ठरावाच्या अनुषंगाने आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेवून सत्ताधारी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे.पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांत राहणाऱ्या नवी मुंबईतील नागरिकांना मालमत्ता करात सूट मिळणार असेल तर ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या निवासी मालमत्तांना करमाफी देण्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईतील सत्ताधाºयांनी करमाफीचा हा निर्णय घेतला आहे. परंतु हा केवळ निवडणूक स्टंट असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे. जर त्यांना खरेच नागरिकांना मालमत्ता करात सूट द्यायची असती तर चार महिन्यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. महापालिकेकडून तशा आशयाचा प्रशासकीय ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवायला हवा होता. मात्र आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पुढील काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या ठरावाला राज्य सरकारची मंजुरी कधी मिळविणार, असा सवाल मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर सवंग घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा हा डाव असून नवी मुंबईतील जनता आता अशा पोकळ घोषणांना बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीकडून प्रस्तावाचे समर्थन- राष्ट्रवादीने नेहमीच नवी मुंबईतील जनतेच्या हिताचा विचार केला आहे. पाचशे फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीचा निर्णय सुद्धा याच भावनेतून घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने अशा स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेने हा प्रस्ताव आणला आहे. राज्य शासनाने चार महिन्यापूर्वी असा निर्णय जाहीर केला असता तर नवी मुंबई महापालिकेने देखील त्याच वेळी असा प्रस्ताव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला असता.- शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच महापौर जयवंत सुतार यांनी हा प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करमाफीचा प्रस्ताव आणल्याचा आरोप बिनबुडाचा व निव्वळ राजकीय स्वरूपाचा असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई