शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

करमाफीचा प्रस्ताव निव्वळ राजकीय - मंदा म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:44 IST

मागील अनेक वर्षांपासून महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

नवी मुंबई : महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा ठराव मंजुरीसाठी आणला जाणार आहे. परंतु केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने हा प्रस्ताव आणल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. त्यामुळे करमाफीच्या या प्रस्तावावरून येत्या काळात राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षांपासून महापालिकेवर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सत्तेवर येताना पुढील वीस वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ न करण्याची घोषणा नाईक यांनी केली होती. त्यानुसार मागील अठरा वर्षात मालमत्ता कर आणि पाणी दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आता त्याही पुढे जात ५00 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करातून शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केला आहे. त्यासाठी महापालिकेच्या आगामी सभेत ठरावही मांडला जाणार आहे. या प्रस्तावित ठरावाच्या अनुषंगाने आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेवून सत्ताधारी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे.पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांत राहणाऱ्या नवी मुंबईतील नागरिकांना मालमत्ता करात सूट मिळणार असेल तर ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या निवासी मालमत्तांना करमाफी देण्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईतील सत्ताधाºयांनी करमाफीचा हा निर्णय घेतला आहे. परंतु हा केवळ निवडणूक स्टंट असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे. जर त्यांना खरेच नागरिकांना मालमत्ता करात सूट द्यायची असती तर चार महिन्यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. महापालिकेकडून तशा आशयाचा प्रशासकीय ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवायला हवा होता. मात्र आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पुढील काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या ठरावाला राज्य सरकारची मंजुरी कधी मिळविणार, असा सवाल मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर सवंग घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा हा डाव असून नवी मुंबईतील जनता आता अशा पोकळ घोषणांना बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीकडून प्रस्तावाचे समर्थन- राष्ट्रवादीने नेहमीच नवी मुंबईतील जनतेच्या हिताचा विचार केला आहे. पाचशे फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीचा निर्णय सुद्धा याच भावनेतून घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने अशा स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेने हा प्रस्ताव आणला आहे. राज्य शासनाने चार महिन्यापूर्वी असा निर्णय जाहीर केला असता तर नवी मुंबई महापालिकेने देखील त्याच वेळी असा प्रस्ताव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला असता.- शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच महापौर जयवंत सुतार यांनी हा प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करमाफीचा प्रस्ताव आणल्याचा आरोप बिनबुडाचा व निव्वळ राजकीय स्वरूपाचा असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई