शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

दिवाळीतच चाखा ‘मलावी हापूस’ची चव; तब्बल ५९८ बाॅक्स दाखल; मार्केटमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 07:17 IST

बाॅक्सला ४५०० ते ५५०० रुपये भाव

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी देशातील हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. शनिवारी ५९८ बाॅक्सची आवक झाली असून १० ते १५ आंब्यांच्या एका बाॅक्सला ४५०० ते ५५०० रुपये भाव मिळत आहे.

फळांच्या राजाची गोडी जगभरातील अनेक देशांतील नागरिकांना आवडू लागली आहे.  भारतामधून अनेक देशांमध्ये आंब्याची निर्यात होते; पण आता इतर देशांमध्येही आंबा लागवड सुरू झाली आहे. पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातही आंबा लागवड केली जात आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मलावी हापूस विक्रीसाठी भारतात येतो.

यावर्षी शनिवारी आंब्याची आवक झाली. पहिल्या दिवशी ५९८ बाॅक्स  आले आहेत.  बाॅक्समध्ये १० ते १६  आंबे आहेत. प्रथेप्रमाणे पहिल्या बाॅक्सचे पूजन करण्यात आले. यावर्षी नोव्हेंबरमध्येच कोकण,  केरळसह विदेशातून आवक सुरू झाल्याने मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोकणातून नेली रोपे मलावी देशातील हवामान कोकणाप्रमाणे आहे. २०११ मध्ये तेथील शेतकऱ्यांनी कोकणातून हापूसची रोपे नेली. तेथे ४०० एकरांवर आंबा बाग तयार केली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये येथील आंबा विक्रीसाठी विविध देशांत पाठविला जातो.

मलावी देशातील हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. २० नोव्हेंबरपासून आवक वाढेल. डिसेंबरपर्यंत हंगाम सुरू राहील.- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई