शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टँकर लॉबीला ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:26 IST

पनवेल शहर व ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मयूर तांबडे पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महापालिकेवर मोर्चे, उपोषण करूनदेखील पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई टँकर लॉबीच्या पथ्यावर पडली आहे. टँकरच्या पाण्याला मागणी वाढल्याने आवाच्या सव्वा दरात पाणी विकले जात आहे. एकूणच पनवेलमधील पाणीटंचाईमुळे येथील टँकर लॉबीला मात्र अच्छे दिन आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.एकीकडे टँकरमुक्त महाराष्ट्राची स्वप्ने सरकार दाखवत असताना, पनवेलसारख्या शहरात गेली अनेक वर्षे उन्हाळ्यात पाण्याच्या तुटवड्यामुळे खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ दरवर्षी येते. पुरविण्यात येणारे पाणी सोसायट्यांना अपुरे पडत असल्याने अनेक सोसायट्यांकडून खासगी टँकरची मागणी केली जाते. मात्र, याच मागणीचा गैरफायदा टँकरचालक-मालक घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, मागील दीड-दोन महिन्यांत शहरातील पाणीप्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे टँकरच्या पाण्याला मागणी वाढली आहे. याचा नेमका फायदा टँकरचालकांनी घेतला आहे. सध्या एक टँकर पाण्यासाठी १५०० ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये तर दिवसाला तीन ते चार टँकरने पाणी लागते. नाइलाजास्तव सोसायट्यांना पाण्यासाठी हा खर्च करावा लागत आहे. खासगी टँकरच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेविषयी खात्री नसल्याने हे पाणी दूषित असल्याच्या तक्र ारी पुढे येत आहेत. हा पाणीपुरवठा म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात शहरी आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फायदा घेऊन टँकर लॉबीने नागरिकांची लूट चालविल्याचा आरोप होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तर हंडाभर पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात महापालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.सोसायट्यांमधील रहिवासी टँकरच्या पाण्यावर जगत आहेत. काही सोसायट्यांतील रहिवासी पिण्याबरोबरच स्वच्छतागृहातही बंद बाटलीतील बिस्लरी पाण्याचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात बिस्लरी पाण्याच्या बाटल्यांनाही चांगली मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.