शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात

By नारायण जाधव | Updated: July 4, 2024 15:24 IST

ही वाहिनी खारघरपर्यंत आली असून ती संपूर्ण दिवाळे, ठाणे, बेलापूर, न्हावा मोरवे, उरण या मार्गाने जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कंपन्याचे सांडपाणी समुद्रात सोडण्यासाठी भूमिगत वाहिनीचे काम सुरू आहे. ही वाहिनी खारघरपर्यंत आली असून ती संपूर्ण दिवाळे, ठाणे, बेलापूर, न्हावा मोरवे, उरण या मार्गाने जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मात्र, या वाहिनीमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे जलप्रदूषण होऊन मासे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळे - बेलापूर येथील स्थानिक कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पाॅइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हे सांडपाणी शुद्ध करून इतरत्र सोडण्याची मागणी केली.

तळोजातील कंपन्यांचे सांडपाणी हे समुद्रात सोडले तर संपूर्ण कोकण किनारपट्टीतील मासेमारी ही धोक्यात येणार आहे. ज्या कंपनीचे पाइपलाइनचे काम चालू त्या कंपनीला त्वरित त्याचे शुद्धीकरण करून इतरत्र सोडण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी म्हात्रे यांनी विधिमंडळात केली.

कंपनी प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक

मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी याबाबत तळोजातील सर्व संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत व विधिमंडळातील सदस्यांची बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावून कोकण किनारपट्टीतील कोळी बांधवांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईwater pollutionजल प्रदूषणfishermanमच्छीमार