शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना पुन्हा कामावर घ्या; स्थानिक प्रकल्पग्रस्त समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 03:03 IST

अधिकाऱ्यांना कंपनीत येऊ देणार नसल्याचा इशारा

उरण : जेएनपीटीतील एपीएम टर्मिनलमध्ये (मर्क्स) पर्ल फे्रं ट्स सर्व्हिसेसच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया उरण आणि शिरढोणमधील कमी केलेल्या १४३ कामगारांना आठ दिवसांत पुन्हा कामावर घेतले नाहीत तर यापुढे अधिकाºयांना कं पनीत पाऊलच ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय हुतात्मा स्थानिक प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.द्रोणागिरी नोडमध्ये एपीएम (मर्क्स) कंपनीचे कंटेनर टर्मिनल आहे. एपीएम या बहुराष्टÑीय कंपनीचे बहुतांश कंटेनर हाताळणी आणि इतर कामे ठेकेदारी पद्धतीवर १८७ कामगार काम करीत आहेत. एपीएम कंटेनर टर्मिनल व्यवस्थापनाने विविध कारणे पुढे करीत उरण येथील प्रकल्पबाधित ९९ तर पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील कंपनीतील ४४ अशा एकूण १४३ कामगारांना कामावरून कमी केले आहे. त्याविरोधात मागील फेब्रुवारीपासूनच एपीएम कंटेनर टर्मिनल (मर्क्स) कंपनीविरोधात कामगारांचा जोरदार संघर्ष आहे. व्यवस्थापनाशी चर्चा, बैठका, अर्ज, विनवण्या केल्यानंतरही कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही. त्यानंतर दिल्ली केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतरांबरोबरही कंपनी व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांच्यातही अनेकदा बैठका झाल्या. सकारात्मक चर्चेअंती कामगारांना कामावर घेण्याबाबत आश्वासनेही देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र एकाही कामगाराला कामावर घेण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वपक्षीय हुतात्मा स्थानिक प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने महेश बालदी आणि विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (२४) गेट बंद आंदोलन सुरू केले होते. एपीएम टर्मिनलमध्ये (मर्क्स) कंपनी व्यवस्थापनाविरोधात मंगळवारी गेट बंद आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, शेकापचे महादेव घरत, काँग्रेसचे वैजनाथ ठाकूर, राम भगत, पागोटे सरपंच भार्गव पाटील, प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष रवि भोईर तसेच विविध राजकीय पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी आणि कामगारांच्या कुटुंबीयांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई