शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कामगारांना पुन्हा कामावर घ्या; स्थानिक प्रकल्पग्रस्त समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 03:03 IST

अधिकाऱ्यांना कंपनीत येऊ देणार नसल्याचा इशारा

उरण : जेएनपीटीतील एपीएम टर्मिनलमध्ये (मर्क्स) पर्ल फे्रं ट्स सर्व्हिसेसच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया उरण आणि शिरढोणमधील कमी केलेल्या १४३ कामगारांना आठ दिवसांत पुन्हा कामावर घेतले नाहीत तर यापुढे अधिकाºयांना कं पनीत पाऊलच ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय हुतात्मा स्थानिक प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.द्रोणागिरी नोडमध्ये एपीएम (मर्क्स) कंपनीचे कंटेनर टर्मिनल आहे. एपीएम या बहुराष्टÑीय कंपनीचे बहुतांश कंटेनर हाताळणी आणि इतर कामे ठेकेदारी पद्धतीवर १८७ कामगार काम करीत आहेत. एपीएम कंटेनर टर्मिनल व्यवस्थापनाने विविध कारणे पुढे करीत उरण येथील प्रकल्पबाधित ९९ तर पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील कंपनीतील ४४ अशा एकूण १४३ कामगारांना कामावरून कमी केले आहे. त्याविरोधात मागील फेब्रुवारीपासूनच एपीएम कंटेनर टर्मिनल (मर्क्स) कंपनीविरोधात कामगारांचा जोरदार संघर्ष आहे. व्यवस्थापनाशी चर्चा, बैठका, अर्ज, विनवण्या केल्यानंतरही कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही. त्यानंतर दिल्ली केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतरांबरोबरही कंपनी व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांच्यातही अनेकदा बैठका झाल्या. सकारात्मक चर्चेअंती कामगारांना कामावर घेण्याबाबत आश्वासनेही देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र एकाही कामगाराला कामावर घेण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वपक्षीय हुतात्मा स्थानिक प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने महेश बालदी आणि विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (२४) गेट बंद आंदोलन सुरू केले होते. एपीएम टर्मिनलमध्ये (मर्क्स) कंपनी व्यवस्थापनाविरोधात मंगळवारी गेट बंद आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, शेकापचे महादेव घरत, काँग्रेसचे वैजनाथ ठाकूर, राम भगत, पागोटे सरपंच भार्गव पाटील, प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष रवि भोईर तसेच विविध राजकीय पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी आणि कामगारांच्या कुटुंबीयांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई