शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

उपलब्ध जातीचे दाखले ग्राह्य धरून निवडणुका घ्या

By admin | Updated: July 6, 2017 06:23 IST

तालुक्यातील नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमध्ये महादेव कोळी समाजाचे (अनुसूचित जमातीचे) जातीचे दाखले अवैध ठरविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमध्ये महादेव कोळी समाजाचे (अनुसूचित जमातीचे) जातीचे दाखले अवैध ठरविण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वी प्रशासन आरक्षण काढून मोकळे होते, मात्र जातीचे दाखलेच नसल्याने निवडणूक लढवायची कशी असा मोठा प्रश्न या समाजाला पडला आहे. उपलब्ध असलेले जातीचे दाखले ग्राह्य धरून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी नवेदर नवगाव ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांना दिले.लोकशाही बळकट व्हावी यासाठी ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व दिले जाते. लोकशाही मार्गाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांच्यामार्फत गावातील सर्वसमावेशक विकास कामांचे राहटगाडे ओढले जाते. ग्रामपंचायतीवर प्रत्येकालाच प्रतिनिधित्व करता यावे आणि आपल्या समाजाचा विकास साधता यावा यासाठी कायद्यामध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे. मात्र कायद्याने दिलेल्या अधिकाराचा महादेव कोळी समाजाला उपयोग होताना दिसत नाही. राजकीय उदासीनता आणि प्रशासनाचे बोटचेपे धोरण याला जबाबदार असल्याचे दिसून येते.नवेदर नवगावची लोकसंख्या सुमारे चार हजार ५०० आहे. पैकी महादेव कोळी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ११ सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक काही कालावधीत पार पडणार असल्याने प्रशासनाने तशी तयारी सुरु केली आहे. प्रभागनिहाय आरक्षण काढण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी २७ जून २०१७ रोजी गावात आले होते. त्यावेळी मंडळ अधिकारीही उपस्थित होते. त्यानुसार अनुसूचित जमातीसाठी सात, नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित करण्यात आली. परंतु महादेव कोळी समाजाकडे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येत नाही. २०१७ साली अनुसूचित जमातीसाठी आठ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आठ उमेदवार निवडूनही आले, मात्र प्रांताधिकाऱ्यांनी वैध ठरविलेले जातीचे दाखले पडताळणी समितीने अवैध ठरविले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर तीन वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे निवडणुका झाल्या तेव्हा उमेदवार असतानाही केवळ जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने निवडणुका लढवता आल्या नाहीत. गेली सात वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार हा प्रशासकांच्या हाती असल्याचे ग्रामस्थ सचिन पावशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जात वैधता प्रमाणपत्रासाठी ५० वर्षांपूर्वीचे पुरावे मागितले जातात. त्यावेळी कोणी शिकलेले नव्हते त्यामुळे पुरावे सादर करता येत नाहीत, असेही पावशे यांनी स्पष्ट केले. उपलब्ध असलेल्या जातींचे दाखले ग्राह्ण धरुन जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र आणि सरकारकडून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीवर ग्रामस्थ ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांचा हा गंभीर प्रश्न राजकारण्यांनी सोडवला नाही. तसेच प्रशासनानेही यामध्ये सकारात्मक भूमिका न घेता केवळ निवडणुका पार पडण्याचे सोपस्कार करीत असल्याचे दिसून येते. सरकारने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन लोकशाहीच्या राज्यात ठरावीक उपेक्षित घटकांची गळचेपी होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमतेची दरी अधिक रुंदावत जाण्याची भीती आहे.