शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

उपलब्ध जातीचे दाखले ग्राह्य धरून निवडणुका घ्या

By admin | Updated: July 6, 2017 06:23 IST

तालुक्यातील नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमध्ये महादेव कोळी समाजाचे (अनुसूचित जमातीचे) जातीचे दाखले अवैध ठरविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमध्ये महादेव कोळी समाजाचे (अनुसूचित जमातीचे) जातीचे दाखले अवैध ठरविण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वी प्रशासन आरक्षण काढून मोकळे होते, मात्र जातीचे दाखलेच नसल्याने निवडणूक लढवायची कशी असा मोठा प्रश्न या समाजाला पडला आहे. उपलब्ध असलेले जातीचे दाखले ग्राह्य धरून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी नवेदर नवगाव ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांना दिले.लोकशाही बळकट व्हावी यासाठी ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व दिले जाते. लोकशाही मार्गाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांच्यामार्फत गावातील सर्वसमावेशक विकास कामांचे राहटगाडे ओढले जाते. ग्रामपंचायतीवर प्रत्येकालाच प्रतिनिधित्व करता यावे आणि आपल्या समाजाचा विकास साधता यावा यासाठी कायद्यामध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे. मात्र कायद्याने दिलेल्या अधिकाराचा महादेव कोळी समाजाला उपयोग होताना दिसत नाही. राजकीय उदासीनता आणि प्रशासनाचे बोटचेपे धोरण याला जबाबदार असल्याचे दिसून येते.नवेदर नवगावची लोकसंख्या सुमारे चार हजार ५०० आहे. पैकी महादेव कोळी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ११ सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक काही कालावधीत पार पडणार असल्याने प्रशासनाने तशी तयारी सुरु केली आहे. प्रभागनिहाय आरक्षण काढण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी २७ जून २०१७ रोजी गावात आले होते. त्यावेळी मंडळ अधिकारीही उपस्थित होते. त्यानुसार अनुसूचित जमातीसाठी सात, नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित करण्यात आली. परंतु महादेव कोळी समाजाकडे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येत नाही. २०१७ साली अनुसूचित जमातीसाठी आठ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आठ उमेदवार निवडूनही आले, मात्र प्रांताधिकाऱ्यांनी वैध ठरविलेले जातीचे दाखले पडताळणी समितीने अवैध ठरविले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर तीन वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे निवडणुका झाल्या तेव्हा उमेदवार असतानाही केवळ जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने निवडणुका लढवता आल्या नाहीत. गेली सात वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार हा प्रशासकांच्या हाती असल्याचे ग्रामस्थ सचिन पावशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जात वैधता प्रमाणपत्रासाठी ५० वर्षांपूर्वीचे पुरावे मागितले जातात. त्यावेळी कोणी शिकलेले नव्हते त्यामुळे पुरावे सादर करता येत नाहीत, असेही पावशे यांनी स्पष्ट केले. उपलब्ध असलेल्या जातींचे दाखले ग्राह्ण धरुन जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र आणि सरकारकडून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीवर ग्रामस्थ ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांचा हा गंभीर प्रश्न राजकारण्यांनी सोडवला नाही. तसेच प्रशासनानेही यामध्ये सकारात्मक भूमिका न घेता केवळ निवडणुका पार पडण्याचे सोपस्कार करीत असल्याचे दिसून येते. सरकारने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन लोकशाहीच्या राज्यात ठरावीक उपेक्षित घटकांची गळचेपी होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमतेची दरी अधिक रुंदावत जाण्याची भीती आहे.