शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गुणवंत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

By admin | Updated: April 11, 2016 01:40 IST

महिला बालकल्याण निधीमधून १० वी, १२ वीमध्ये ८५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले

पनवेल : महिला बालकल्याण निधीमधून १० वी, १२ वीमध्ये ८५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. शनिवारी खारघरमधील उत्कर्ष हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी १५ टक्के मागासवर्गीय निधीमधून आदिवासी बांधवांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खारघर ग्रामपंचायतीची ओळख आहे. खारघर शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास येत आहे. शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच पुढाकार घेत असते. आज विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. अत्याधुनिक युगात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात उपयोगात येईल, या हेतूने खारघरमधील २४९ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी खारघर ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजनी ठाकूर, ग्रामसेवक नवनाथ शेडगे, उपसरपंच सोमनाथ म्हात्रे, पंचायत समिती सभापती चित्रा गायकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पवार, गुरु नाथ गायकर, आशिष भोईर, अशोक गिरमकर, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा बारशे, अनिता पाटील, कुंदा पाटील, उषा अडसुळे, संजय घरत, शंकर म्हात्रे, नीलेश बाविस्कर आदी उपस्थित होते. अनेक वर्षे डोंगरकपारीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना गॅस कनेक्शन देऊन ग्रामपंचायतीने त्यांच्या घरात खऱ्या अर्थाने चुली पेटविल्या. खारघर टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी, बेलपाडा वाडी, धामोले वाडीतील एकूण ८९ कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे उद्गार बाळाराम पाटील यांनी काढले. (प्रतिनिधी)