शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

पेपरतपासणीत घोटाळा झाल्याचा संशय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 01:22 IST

पेपरतपासणीत असंवेदनशीलता आणि घोटाळा असून, या प्रकारची कोणीही जबाबदारी घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर झाला आहे. अनेक विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले असून, पेपरतपासणीत घोटाळा झाल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या वाशी येथील मुंबई विभागीय मंडळाला त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांसह सोमवार, ३ जून रोजी मंडळाचे विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने गुण पत्रिकांची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आली.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून फेरतपासणीसाठी ऑनलाइन प्रकिया धिम्यागतीने सुरू असून गेल्या पाच दिवसांत फक्त १३७ झेरॉक्स काढण्यात आल्या आहेत या गतीने काम झाल्यास पुढील दोन महिनेही विद्यार्थ्यांना गुण मिळणार नसल्याची टीका आव्हाड यांनी केली. राज्यात सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, तीन विद्यार्थ्यांनी जीव गमावला असून फेरतपासणीत हे विद्यार्थी पास झाले असतील तर याला जबाबदार कोण? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. पेपरतपासणीत असंवेदनशीलता आणि घोटाळा असून, या प्रकारची कोणीही जबाबदारी घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोणताही शिक्षक आपल्या शाळातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकात शून्य मार्क देऊ शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रात्यक्षिकात किती गुण मिळाले आहेत याचे सहीनिशीचे पत्र देण्याची मागणी आव्हाड यांनी केली. तसेच फेरतपासणी नंतर करा; परंतु ज्या विषयात विद्यार्थ्यांना शून्य मार्क दिले आहेत त्या विषयाच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. आव्हाड यांच्यासोबत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण फलकावर प्रसिद्ध होणारमुंबई विभागीय मंडळ, मुंबईशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयात या वर्षी बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये देण्यात आलेल्या आणि मंडळाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या गुणपत्रिकेची प्रत महाविद्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याची सूचना विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी दिली आहे.