शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात पालिकेचा सावळा गोंधळ, परवानाधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:52 IST

फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे.

नवी मुंबई : फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात सावळागोंधळ सुरू असून मर्जीतल्या फेरीवाल्यांना लाभार्थी करण्यासाठी हा प्रकार होत आहे.पालिकेतर्फे सध्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. उपलब्ध मार्केटमध्ये फेरीवाल्यांना स्थान देण्यापूर्वी हे सर्वेक्षण करून पात्र फेरीवाल्यांना परवाना मिळणार आहेत. यामुळे पूर्वी ज्यांना पालिकेने परवाने दिले होते त्यांच्या आशा निर्माण झाल्या. पालिकेचा परवाना असताना त्यांना मार्केटमध्ये जागा देण्यापासून डावलले जात होते.शुक्रवारी कोपरखैरणेच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली. त्यात परवानाधारक फेरीवाल्यांच्या हातगाड्या व टपºयांची तोडफोड करण्यात आली असल्याचे श्याम कांबळे यांचे म्हणणे आहे. कांबळे यांच्या पत्नीच्या नावे फेरीवाला परवाना असून कोपरखैरणे सेक्टर ८ येथील फेरीवाला भूखंडावर अनेक वर्षांपासून ते व्यवसाय करत आहेत.सदर भूखंडावर अद्ययावत मार्केट उभारणीच्या बहाण्याने तिथल्या सर्वच फेरीवाल्यांना बाहेर काढले होते. यानंतर एक वर्षापासून इमारत बांधून तयार असतानाही फेरीवाल्यांनी पदपथावर व्यवसाय मांडला. दोन दिवसांपूर्वी तेथे पालिकेतर्फे सर्वेक्षण होणार असल्याची नोटीस लावली. यामुळे लवकरच मार्केटमध्ये हक्काची जागा मिळणार या आनंदात फेरीवाले असतानाच कारवाई झाली आहे. यामध्ये १५ ते २० परवानाधारक फेरीवाल्यांच्या टपºया व हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली. पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत संताप व्यक्त करत सर्वेक्षणात सावळागोंधळ असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. तर अपंग असल्याकारणाने उदरनिर्वाहासाठी परवाना घेऊन सुरू केलेला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा संताप चंद्रकांत धनावडे यांनी व्यक्त केला. या कारवाईमागे कटकारस्थान असून अधिकाºयांच्या मर्जीतल्या अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचे ‘लाभार्थी‘ बनवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप कांबळेंनी केला. परवाना असतानाही पालिकेच्या अधिकाºयांनी केलेल्या कारवाईविरोधात ते पोलिसांकडेही तक्रार करण्यासाठी गेले होते. वेळोवेळी पालिकेचे शुल्क भरूनही झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाकडून आपली फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देऊन पिटाळून लावल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे; परंतु यासंदर्भात विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई