शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात पालिकेचा सावळा गोंधळ, परवानाधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:52 IST

फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे.

नवी मुंबई : फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात सावळागोंधळ सुरू असून मर्जीतल्या फेरीवाल्यांना लाभार्थी करण्यासाठी हा प्रकार होत आहे.पालिकेतर्फे सध्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. उपलब्ध मार्केटमध्ये फेरीवाल्यांना स्थान देण्यापूर्वी हे सर्वेक्षण करून पात्र फेरीवाल्यांना परवाना मिळणार आहेत. यामुळे पूर्वी ज्यांना पालिकेने परवाने दिले होते त्यांच्या आशा निर्माण झाल्या. पालिकेचा परवाना असताना त्यांना मार्केटमध्ये जागा देण्यापासून डावलले जात होते.शुक्रवारी कोपरखैरणेच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली. त्यात परवानाधारक फेरीवाल्यांच्या हातगाड्या व टपºयांची तोडफोड करण्यात आली असल्याचे श्याम कांबळे यांचे म्हणणे आहे. कांबळे यांच्या पत्नीच्या नावे फेरीवाला परवाना असून कोपरखैरणे सेक्टर ८ येथील फेरीवाला भूखंडावर अनेक वर्षांपासून ते व्यवसाय करत आहेत.सदर भूखंडावर अद्ययावत मार्केट उभारणीच्या बहाण्याने तिथल्या सर्वच फेरीवाल्यांना बाहेर काढले होते. यानंतर एक वर्षापासून इमारत बांधून तयार असतानाही फेरीवाल्यांनी पदपथावर व्यवसाय मांडला. दोन दिवसांपूर्वी तेथे पालिकेतर्फे सर्वेक्षण होणार असल्याची नोटीस लावली. यामुळे लवकरच मार्केटमध्ये हक्काची जागा मिळणार या आनंदात फेरीवाले असतानाच कारवाई झाली आहे. यामध्ये १५ ते २० परवानाधारक फेरीवाल्यांच्या टपºया व हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली. पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत संताप व्यक्त करत सर्वेक्षणात सावळागोंधळ असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. तर अपंग असल्याकारणाने उदरनिर्वाहासाठी परवाना घेऊन सुरू केलेला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा संताप चंद्रकांत धनावडे यांनी व्यक्त केला. या कारवाईमागे कटकारस्थान असून अधिकाºयांच्या मर्जीतल्या अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचे ‘लाभार्थी‘ बनवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप कांबळेंनी केला. परवाना असतानाही पालिकेच्या अधिकाºयांनी केलेल्या कारवाईविरोधात ते पोलिसांकडेही तक्रार करण्यासाठी गेले होते. वेळोवेळी पालिकेचे शुल्क भरूनही झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाकडून आपली फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देऊन पिटाळून लावल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे; परंतु यासंदर्भात विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई