शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:31 IST

Pahalgam Terror Attack Navi Mumbai Maharashtra Subodh Patil News: अनेक तास बेशुद्धावस्थेत होतो. स्थानिकांनी मला तेथून बाहेर काढले. लष्करांच्या जवानांनी प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल केले. सात दिवस उपचार सुरू होते, असे या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या सुबोध पाटील यांनी सांगितले.

Pahalgam Terror Attack Navi Mumbai Maharashtra Subodh Patil News: पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढलेला असतानाच जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारताने सिंधू जलकरार रद्द केल्याच्या रात्रीपासून म्हणजेच २४ एप्रिलपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे, अशी माहिती जम्मू येथील संरक्षण प्रवक्त्यांनी दिली. यातच नवी मुंबईत राहणारे सुबोध पाटील या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. सुखरूप घरी परतलेल्या सुबोध पाटील यांनी अतिशय थरारक अनुभव सांगितला. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएची एक विशेष टीम अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली असून, यात बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि हल्ल्यानंतर कुठल्या मार्गाने पळ काढला, याचा शोध घेतला जात आहे. अगदी मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या सुबोध पाटील यांनी अंगावर काटा आणणारा अनुभव कथन केला. 

नवी मुंबईच्या सुबोध पाटील यांनी सांगितला थरारक अनुभव

पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले सुबोध पाटील सुखरूपपणे आपल्या नवी मुंबईतील निवासस्थानी परतले. पहलगाम येथील हल्ल्याबाबत सुबोध पाटील यांनी अतिशय थरारक असा अनुभव कथन केला. मीडियाशी बोलताना सुबोध पाटील यांनी सांगितले की, मागून कसला तरी आवाज येत होता. परंतु, नेमके काय सुरू आहे, ते कळत नव्हते. तो आवाज सलगपणे सुरूच होता आणि तेथे उपस्थित असलेले लोक सैरावैरा पळत होते. आम्हीही अत्यंत घाबरलो आणि वाट मिळेल, तिथे पळू लागलो. काही अंतर गेल्यावर समोरच काही लोक बसलेले दिसले. त्यामुळे आम्हीही तिथे बसलो. तेवढ्यात एक दहशतवादी तेथे आला आणि म्हणाला की, तुमच्यापैकी जे हिंदू आहेत, त्यांनी उभे राहा. असे सांगताच त्याने गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्यातील गोळ्या मला लागून मी खाली पडलो. अनेक तासांनी शुद्ध आली, तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडलेले पाहिले. ज्या स्थानिकाने मला त्या बैसरन खोऱ्यात नेले होते, त्याने मला ओळखले. त्याने मला प्यायला पाणी दिले आणि पाठीवर घेऊन मला तिथून बाहेर काढले. तेथून बाइकवरून खाली घेऊन आला. लष्कराच्या जवानांनी माझ्यावर प्राथमिक उपचार केले आणि रुग्णालयात दाखल केले. तिथून मला हेलिकॉप्टरने लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे सात दिवस माझ्यावर उपचार सुरू होते, असे सुबोध पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा संकल्प आहे. जर कोणी भ्याड हल्ला करून हा आपला मोठा विजय आहे असे समजत असेल, तर एक गोष्ट समजून घ्या की, हे नरेंद्र मोदी सरकार आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. या देशाच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याचा संकल्प आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरNavi Mumbaiनवी मुंबई